शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आदिवासी शेतकरी संकटात

By admin | Updated: April 20, 2015 04:22 IST

गारपीट व जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे हिरड्याचा बार झडल्याने हिरड्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

डिंभे : गारपीट व जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे हिरड्याचा बार झडल्याने हिरड्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला भातपीक वाया गेले. आता हिरड्याला अवकाळीचा फटका बसल्याने धान्यही नाही आणि पैसाही नाही, अशी स्थिती आदिवासी शेतकऱ्यांची झाली आहे. वारंवार मागणी करूनही हिरड्याच्या झाडांच्या नोंदी आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबारावर झाल्या नाहीत. यामुळे नुकसान होऊनही यंदा आदिवासी शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. आंबेगाव तालुक्याबरोबरच जुन्नर व खेड तालुक्यांतील पश्चिम भागात दरवर्षी आदिवासी शेतकऱ्यांकडून मोठया प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. भातशेती हे या भागातील प्रमुख पीक असून हिरड्याचे उत्पादन हे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या अर्थार्जनाचे एकमेव साधन आहे. मार्च-एप्रिलच्या दरम्यान हिरड्याची झाडे बार धरण्यास सुरूवात करतात. तर मे महिन्यामध्ये या भागात हिरडा गोळा करण्याचा हंगाम सुरू असतो. दरवर्षी या भागातील आदिवासी शेतकऱ्यांकडून हजारो क्विंटल हिरडा गोळा केला जातो. हा गोळा केलेला हिरडा आदिवासी महामंडळ व खाजगी व्यापा-यांना विकून मिळणाऱ्या पैशावर आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवीत असतात. हिरडा उत्पादनातून दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होत असते. आंबेगाव तालुक्यास जुन्नर व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात एप्रिल महिन्यामध्ये अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे नुकतीच बार धरू लागलेल्या हिरड्याच्या झाडांचे नुकसान झाले. झाडांना लगडलेला बार गळून खाली पडल्याने यंदा या परिसरात केवळ कोवळ्या पानांनी लगडलेली हिरड्याची झाडे पाहावयास मिळत आहेत. या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात कमीत कमी २० ते २५ हिरड्यांची झाडे असतात. काही शेतकऱ्यांच्या शेतात तर पिढ्यान्पिढ्या राखून ठेवलेली हिरड्यांची झाडे आहेत. हिरड्याच्या एका मोठ्या झाडापासून १ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. ६० रुपये प्रतिकिलोप्रमाणे हिशोब केल्यास हंगामात एका झाडापासून आदिवासी शेतकऱ्यांना सहा हजारापर्यंतचे उत्पन्न मिळते. सातबाराव नोंदीच नसल्याने नुकसानीचे पंचानमे कसे करावयाचे असा प्रश्न उपस्थित करून आदिवासी शेतकऱ्यांना हिरड्याच्या नुकसान भरपायीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. सुरूवातीला अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान केले. आता हिरड्याच्याही उत्पन्नावर घाला पडल्याने शेतकरी पुरता रिकामा झाला असून धान्यही नाही. (वार्ताहर)