शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

आदिवासी शेतकरी संकटात

By admin | Updated: April 20, 2015 04:22 IST

गारपीट व जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे हिरड्याचा बार झडल्याने हिरड्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

डिंभे : गारपीट व जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे हिरड्याचा बार झडल्याने हिरड्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला भातपीक वाया गेले. आता हिरड्याला अवकाळीचा फटका बसल्याने धान्यही नाही आणि पैसाही नाही, अशी स्थिती आदिवासी शेतकऱ्यांची झाली आहे. वारंवार मागणी करूनही हिरड्याच्या झाडांच्या नोंदी आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबारावर झाल्या नाहीत. यामुळे नुकसान होऊनही यंदा आदिवासी शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. आंबेगाव तालुक्याबरोबरच जुन्नर व खेड तालुक्यांतील पश्चिम भागात दरवर्षी आदिवासी शेतकऱ्यांकडून मोठया प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. भातशेती हे या भागातील प्रमुख पीक असून हिरड्याचे उत्पादन हे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या अर्थार्जनाचे एकमेव साधन आहे. मार्च-एप्रिलच्या दरम्यान हिरड्याची झाडे बार धरण्यास सुरूवात करतात. तर मे महिन्यामध्ये या भागात हिरडा गोळा करण्याचा हंगाम सुरू असतो. दरवर्षी या भागातील आदिवासी शेतकऱ्यांकडून हजारो क्विंटल हिरडा गोळा केला जातो. हा गोळा केलेला हिरडा आदिवासी महामंडळ व खाजगी व्यापा-यांना विकून मिळणाऱ्या पैशावर आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवीत असतात. हिरडा उत्पादनातून दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होत असते. आंबेगाव तालुक्यास जुन्नर व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात एप्रिल महिन्यामध्ये अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे नुकतीच बार धरू लागलेल्या हिरड्याच्या झाडांचे नुकसान झाले. झाडांना लगडलेला बार गळून खाली पडल्याने यंदा या परिसरात केवळ कोवळ्या पानांनी लगडलेली हिरड्याची झाडे पाहावयास मिळत आहेत. या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात कमीत कमी २० ते २५ हिरड्यांची झाडे असतात. काही शेतकऱ्यांच्या शेतात तर पिढ्यान्पिढ्या राखून ठेवलेली हिरड्यांची झाडे आहेत. हिरड्याच्या एका मोठ्या झाडापासून १ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. ६० रुपये प्रतिकिलोप्रमाणे हिशोब केल्यास हंगामात एका झाडापासून आदिवासी शेतकऱ्यांना सहा हजारापर्यंतचे उत्पन्न मिळते. सातबाराव नोंदीच नसल्याने नुकसानीचे पंचानमे कसे करावयाचे असा प्रश्न उपस्थित करून आदिवासी शेतकऱ्यांना हिरड्याच्या नुकसान भरपायीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. सुरूवातीला अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान केले. आता हिरड्याच्याही उत्पन्नावर घाला पडल्याने शेतकरी पुरता रिकामा झाला असून धान्यही नाही. (वार्ताहर)