शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शेतकरी संकटात

By admin | Updated: April 20, 2015 04:22 IST

गारपीट व जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे हिरड्याचा बार झडल्याने हिरड्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

डिंभे : गारपीट व जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे हिरड्याचा बार झडल्याने हिरड्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला भातपीक वाया गेले. आता हिरड्याला अवकाळीचा फटका बसल्याने धान्यही नाही आणि पैसाही नाही, अशी स्थिती आदिवासी शेतकऱ्यांची झाली आहे. वारंवार मागणी करूनही हिरड्याच्या झाडांच्या नोंदी आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबारावर झाल्या नाहीत. यामुळे नुकसान होऊनही यंदा आदिवासी शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. आंबेगाव तालुक्याबरोबरच जुन्नर व खेड तालुक्यांतील पश्चिम भागात दरवर्षी आदिवासी शेतकऱ्यांकडून मोठया प्रमाणात हिरडा गोळा केला जातो. भातशेती हे या भागातील प्रमुख पीक असून हिरड्याचे उत्पादन हे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या अर्थार्जनाचे एकमेव साधन आहे. मार्च-एप्रिलच्या दरम्यान हिरड्याची झाडे बार धरण्यास सुरूवात करतात. तर मे महिन्यामध्ये या भागात हिरडा गोळा करण्याचा हंगाम सुरू असतो. दरवर्षी या भागातील आदिवासी शेतकऱ्यांकडून हजारो क्विंटल हिरडा गोळा केला जातो. हा गोळा केलेला हिरडा आदिवासी महामंडळ व खाजगी व्यापा-यांना विकून मिळणाऱ्या पैशावर आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवीत असतात. हिरडा उत्पादनातून दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होत असते. आंबेगाव तालुक्यास जुन्नर व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात एप्रिल महिन्यामध्ये अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे नुकतीच बार धरू लागलेल्या हिरड्याच्या झाडांचे नुकसान झाले. झाडांना लगडलेला बार गळून खाली पडल्याने यंदा या परिसरात केवळ कोवळ्या पानांनी लगडलेली हिरड्याची झाडे पाहावयास मिळत आहेत. या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात कमीत कमी २० ते २५ हिरड्यांची झाडे असतात. काही शेतकऱ्यांच्या शेतात तर पिढ्यान्पिढ्या राखून ठेवलेली हिरड्यांची झाडे आहेत. हिरड्याच्या एका मोठ्या झाडापासून १ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. ६० रुपये प्रतिकिलोप्रमाणे हिशोब केल्यास हंगामात एका झाडापासून आदिवासी शेतकऱ्यांना सहा हजारापर्यंतचे उत्पन्न मिळते. सातबाराव नोंदीच नसल्याने नुकसानीचे पंचानमे कसे करावयाचे असा प्रश्न उपस्थित करून आदिवासी शेतकऱ्यांना हिरड्याच्या नुकसान भरपायीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. सुरूवातीला अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान केले. आता हिरड्याच्याही उत्पन्नावर घाला पडल्याने शेतकरी पुरता रिकामा झाला असून धान्यही नाही. (वार्ताहर)