शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आदिवासी भाग दुष्काळी छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:56 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे, या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे, या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी मुसळधार पडणाºया पावसाची माहेरघर समजली जातात; परंतु या भागामध्ये खापर पंजोबा उपार्जित काळापासून आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मैलोंमैल पायपीट करावी लागत आहे. पावसाळ्यामध्ये चार महिने मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही.अनेक वर्षांपासून या भागातील आदिवासी बांधवांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या भागातील विहिरी, शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, तळी आदी उपलब्ध असणारे जलस्रोत पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतात; परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, कूपनलिका, पाझर तलाव यासारखे जलस्रोत काढण्यात आले आहेत; परंतु या भागात पडणाºया दुष्काळासमोर या जलस्रोतांनी गुडघे टेकले आहेत. या भागातील असणाºया जलस्रोतांमधील पाणी खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. या पाण्याची दुर्गंधी येत असून पर्यायी हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे.परिणामी, सध्या या भागामध्ये आदिवासी जनतेला साथीच्या रोगांचा सामना करावा लागत आहे.अवघ्या हाकेच्या अंतरावरती डिंभे धरण उशाला असून वर्षानुवर्ष या भागातील जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, कोंढरे, कुशिरे, माळीण, आमडे, कोंढवळ, राजापूर, फलोदे, फुलवडे या गावांच्या मोहरेवाडी, नंदकरवाडी, गोहे खुर्द, गाडेकरवाडी, डामसेवाडी, जांभोरीची माचीचीवाडी, काळवाडी नं. १, काळवाडी नं. २, नानवडे, आहुपे, बालवीरवाडी, वनदेव, बोरघरची जायवाडी, घोडेवाडी, आवळेवाडी, माळवाडी, घोटमाळ, असाणे, जांभळवाडी, मेनुंबरवाडी, कुंभेवाडी, गवारवाडी, सावरली, गोहे बुद्रुक, बोरीचीवाडी, पाटीलबुवाचीवाडी, सायरखळा, उभेवाडी, वाल्मीकवाडी, पाचवड, पोटकुलवाडी या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. या भागामध्ये जसा जसा उन्हाळा जाणवत आहे, तसतशा दुष्काळाच्या झळा आदिवासी जनतेला सोसाव्या लागत आहेत.>ग्रामपंचायतींनी टँकरचे प्रस्ताव द्यावेतज्या गावांसाठी पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे, त्या ग्रामपंचायतींनी पंचायत समितीला तत्काळ प्रस्ताव द्यावेत. प्रस्ताव उशिरा आल्यामुळे हे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठवून त्यांना मंजुरी मिळण्यासाठी उशीर होतो. तालुक्यात दुष्काळावर कशी मात करता येईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे. येथून पुढे ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे, अशा गावातील ग्रामसेवक, सरपंच यांना पंचायत समितीमध्ये बोलावून तत्काळ प्रस्ताव तयार करून घेऊन जिल्हाधिकाºयांकडे मंजुरीसाठी पाठवून लवकरात लवकर त्या गावांना टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येईल.- नंदकुमार सोनावले, आंबेगाव पंचायत समिती उपसभापतीसद्य:स्थितीमध्ये तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढरे, कुशिरे, माळीण, जांभोरी, तळेघर, फलोदे, गोहे सायरखळा, उभेवाडी, बोरीचीवाडी, आमडे, तर पूर्व भागातील वडगाव पीर मांदळेवाडी, निघोटवाडीची दस्तुरवाडी पारगावतर्फे खेड या गावांचे ट्रँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून, यामध्ये फक्त दोन प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये पारगाव तर्फे खेड या गावासाठी दोन टँकर व माळीण व आमडे या गावासाठी एक टँकर मंजूर झाला आहेत.