शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

कलाकृतींच्या भाषांतरामध्ये आत्म्याचं आत्म्यात रूपांतर झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपल्याकडे भाषांतर क्षेत्र हे कायमच दुर्लक्षित राहिलं आहे. खरंतर भाषांतरं व्हायला हवीत. वेगवेगळ्या भाषांमधल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आपल्याकडे भाषांतर क्षेत्र हे कायमच दुर्लक्षित राहिलं आहे. खरंतर भाषांतरं व्हायला हवीत. वेगवेगळ्या भाषांमधल्या कलात्मक संवेदना पोहोचण्यासाठी त्याचा उपयोग होतो. भाषांतर झालं तरी ते सादर करताना सांस्कृतिक संचित, स्थानिक परंपरा लक्षात घ्याव्या लागतात. त्यानुसार त्यात बदल करावे लागतात. भाषांतर झालं म्हणजे, माणसाने नुसता सदरा बदलला असं होत नाही. आत्म्याचं आत्म्यात रुपांतर झालं पाहिजे, असे मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी व्यक्त केले.

प्रसिद्ध भाषांतरकार निनाद जाधव यांनी ‘ययाती आणि देवयानी’ या संगीत नाटकांच्या केलेल्या इंग्रजी भाषांतरित पुस्तकांच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार उल्हास पवार यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या नांदीने झाली.

आळेकर म्हणाले की, भाषेतलं सांस्कृतिक संचित लेखकांना केव्हा ना केव्हा तरी मोह घालतं. ययाती आणि देवयानी नाटकाचे भाषांतर मला महत्त्वाचं वाटतं. कारण याच्या मधल्या कथेचा आजच्या काळात कंटेम्पररी रेलेवन्स आहे. याच्यातला एक समकालीनत्व इंग्रजीत वाचून एखाद्या दिग्दर्शकाला कदाचित आव्हानात्मक वाटेल. यातला अर्थनिर्णय वापरून एखाद्याला संपूर्ण नवा आयाम आजच्या काळातला सादर करावासा वाटेल. त्यामुळे भाषांतर व्हायला पाहिजे. आपल्या संगीत रंगभूमीचं संचित, भाषांतरामुळे इतर भाषेमध्ये, सांस्कृतिक संवेदनेमध्ये जाण्यासाठी एक पायवाट तयार होते. असच्या असं झालं पाहिजे असं नाही. त्यातला आत्मा शोधावा लागतो. त्यासाठी तरुण रंगकर्मींनी प्रयत्न करायला हवेत.

निनाद जाधव यांनी मराठी संगीत नाटक अमराठी लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांनी त्याचे प्रयोगही करावेत यासाठी हा भाषांतराचा प्रयत्न केला आहे. नाटकातली पद्य मुक्तछंदामध्ये भाषांतरीत केली असल्याचे सांगितले. नाटकातल्या सादरी करणाबाबत विचार मांडताना त्यांनी एका गाण्याचा इंग्रजी आविष्कार देखील सादर केला.

अध्यक्षीय भाषणात उल्हास पवार म्हणाले की, बाळासाहेब भारदे भाषांतरबद्दल म्हणायचे की भाषांतर म्हणजे एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्यामध्ये विलीन होणे. ययाती आणि देवयानी नाटकाचे भाषांतर निनादने आत्मीयतेने केले आहे.

त्याने आत्मा त्यात ओतला आहे. एका भाषेतून दुस-या भाषेत भाषांतरं झाली तर भाषाही समृद्ध होतील ही खऱ्या अर्थांने आंतरभारतीची किंवा गांधीजींची कल्पना होती.