शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

वाहतूक कोंडीचा झाला कहर

By admin | Updated: May 29, 2016 00:19 IST

औरंगाबाद : रोशनगेट, बायजीपुरा आदी वसाहतींमध्ये महापालिकेने भूमिगत गटार योजनेची कामे हाती घेतली आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी महापालिकेने कोणत्याही पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली नाही.

औरंगाबाद : रोशनगेट, बायजीपुरा आदी वसाहतींमध्ये महापालिकेने भूमिगत गटार योजनेची कामे हाती घेतली आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी महापालिकेने कोणत्याही पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली नाही. त्यामुळे दररोज लाखो वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोणताही रस्ता बंद करण्यापूर्वी मनपाने अगोदर पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, मगच काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.चंपाचौक येथे दोन महिन्यांपूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होते. या कामामुळे परिसरातील रस्ता सुमारे १५ दिवस बंद होता. नंतर चंपाचौक ते रोशनगेट या रस्त्यावरील एक बाजू दोन महिने बंद ठेवण्यात आली. मागील आठ दिवसांपासून रोशनगेट ते मदनी चौकाकडे जाणारा प्रमुख रस्ता बंद करण्यात आला आहे. बायजीपुरा येथील मुख्य रस्ताही बंद केला आहे. शहा बाजारहून चंपाचौकाकडे येणारा रस्ता चार दिवसांपासून बंद केला. काल रात्री सुरू असलेला रस्ता दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक बंद होतो. कोणता रस्ता किती दिवस बंद राहणार याची कोणतीही पूर्वसूचना मनपा नागरिकांना देत नाही. एखादा रस्ता बंद केल्यावर त्या भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता आहे किंवा नाही, याचा अजिबात विचार करण्यात येत नाही. अचानक रोशनगेट, बायजीपुरा, चंपाचौक आदी भागांतील प्रमुख रस्ते बंद झाल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.रोशनगेटकडून मदनी चौकाकडे २४ तासंत ५० ते ६० हजार वाहनधारक ये-जा करतात. मनपाने भूमिगत गटार योजनेसाठी रस्ता बंद केल्याने नागरिकांना बारी कॉलनी येथील अरुंद रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. या अरुंद रस्त्यावर दिवसभरातून एक हजार वेळेस वाहतूक कोंडी होत आहे. या गल्लीत राहणाऱ्या नागरिकांना मागील पंधरा दिवसांपासून अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या अरुंद गल्लीच्या तोंडावर काही व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे एक रिक्षाही येथून व्यवस्थित ये-जा करू शकत नाही.चंपाचौक ते रोशनगेट या प्रमुख रस्त्यावर भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराने एका बाजूने रस्त्याचे मजबुतीकरण सुरू केले आहे. हे काम एवढ्या संथगतीने सुरू आहे की, पावसाळ्यापूर्वी काम संपण्याची कोणतीही शक्यता नाही. पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा चार महिने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल.