शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

आळंदीतील व्यापाऱ्यांचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:10 IST

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ३० मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात ...

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ३० मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे, संचारबंदी व जमावबंदी तसेच प्रत्येक शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन केले जाईल. मात्र, या लॉकडाऊनला व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. आस्थापने बंद असतानाही बँकेचे व्याज सुरू असून वेळेवर हप्ता भरावाच लागतो. त्यामुळे व्यापारी व व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे किमान आठवड्यातील पाच दिवस सकाळी ९ ते ६ या वेळेत आस्थापने उघडी ठेवण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून पोलीस आणि नगर परिषद यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, लॉकडाऊनचा निर्णय हा शासन स्तरावरील असून आपल्या मागण्या जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सादर करण्यात येईल अशी ग्वाही आळंदी नगर परिषदचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, मच्छिंद्र शेंडे, नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर दिघे, माऊली गुळुंजकर, सुनील रानवडे, राजेंद्र पवार, चारुदत्त प्रसादे, जनककुमार जोशी आदिंसह व्यापारीवर्ग उपस्थित होता.

०८आळंदी विरोध

आळंदी नगर परिषद व पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देताना व्यापारी.