शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवत /उरुळी कांचन : मोदीसरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे करणारे सरकार असून ते फक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

यवत /उरुळी कांचन : मोदीसरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे करणारे सरकार असून ते फक्त ‘हम दो-हमारे दो’ यांच्यासाठीच देशातील पैशाचा वापर करीत असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी उरुळी कांचन येथील सभेत बोलताना केली, हे शेतकरी व कामगारविरोधी काळे कायदे जोपर्यंत रद्द होत नाहीत तोपर्यंत महात्मा गांधींच्या मार्गाने लढा चालूच राहणार असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात पुणे-सोलापूर महामार्गवरून पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व ट्रॅक्टर रैलीत सहभागी झाले होते.

मोदी सरकारच्या विरोधात ढोल-ताशा वाजवत घोषणा देत ही रॅली यवत मधून सकाळी ११ वाजता उरुळी कांचनच्या दिशेने गेली. या रॅलीमध्ये १०० च्या जवळपास ट्रॅक्टर घेऊन शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते हजर झाले होते. पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत ते उरुळी कांचन अशी पंधरा किलोमीटरची ट्रॅक्टर रॅली काढून ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘नही चलेगी नही चलेगी मोदी की हिटलरशाही नही चलेगी,’ अशा सरकार विरोधी तर ‘जय जवान-जय किसान’ अशी शेतकऱ्यांच्या बाजूने घोषणा दिल्याने पुणे-सोलापूर मार्ग दुमदुमला. शेतकऱ्यांबरोबरच राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे ही काही कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, माजी जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य देविदास भन्साळी, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ गुजर, तसेच १२ तालुक्यातील तालुका अध्यक्ष व ७ नगरपालिकांचे अध्यक्ष आणि महिला काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकारी सहभागी झाले होते.

माजी खासदार अशोक मोहोळ म्हणाले की, कोणताही कायदा करताना घटनेने त्या कायद्यासंदर्भात संसदेमध्ये सरकार पक्ष व विरोधकांच्या प्रतिनिधींना याबाबत आपले विचार मांडण्याची व चर्चा करण्याची संधी देण्याची प्रथा आहे. परंतु ती पायदळी तुडवून या सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात हा काळा कायदा मंजूर केल्याने ७० टक्के शेतकरी समाज असलेल्या या देशात सर्वसामान्य नागरिकाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

देविदास भन्साळी म्हणाले की, हे केंद्र सरकार हम दो-हमारे दो म्हणजे मोदी, अमित शहा, अदानी, अंबानी यांच्यासाठीच जनतेला वेठीस धरत आहे. पेट्रोलचा भाव गगनाला भिडला असतानाही या केंद्र सरकारला सर्वसामान्य नागरिकांची होणारी गळचेपी थांबवण्याची इच्छा होत नाही हे लोकशाहीला मान्य नसणारे कृत्य आहे.

आमदार संजय जगताप म्हणाले की, केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. शेतकऱ्यांची पिळवणूक चालवलेली आहे. ही पिळवणूक थांबवण्यासाठी राज्यभर काँग्रेस पक्षाच्या वतीने या काळ्या कायद्याच्या विरोधात आंदोलने केली जाणार आहे. जिल्ह्यातील आंदोलनाची सुरुवात आजच्या या ट्रॅक्टर रॅलीने झाली आहे.

चौकट

महामार्गावर ट्रॅक्टरच्या रांगा..

दौंड तालुक्यातील शेतकरी यवत येथून ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले होते. तर पुरंदर तालुक्यातील शेतकरी भुलेश्वर घाटातून खाली येऊन महामार्गालगत भुलेश्वर फाटा येथून रॅलीत सहभागी झाले. भुलेश्वर फाट्यापासून लांबच लांब ट्रॅक्टरच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या. महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

चौकट

यवत पोलिसांनी यवत ते चंदनवाडी दरम्यान महामार्गावर वाहतूककोंडी होणार नाही यासाठी दक्षता घेतली. मोदी सरकार हाय हाय, अहंकारी सरकारला घरी बसवा, शेतकऱ्यांना न्याय द्या, काळे कृषी कायदे मागे घ्या या घोषनांणी परिसर दुमदुमला होता.

फोटो:- यवत मधून जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात काढण्यात आलेली रॅली