शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कादंबरीमध्ये पानशेत धरणफुटीचा मागोवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले आणि सर्वत्र हाहाकार माजला. त्या काळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले आणि सर्वत्र हाहाकार माजला. त्या काळी छोट्या असलेल्या पुण्यातील लोक मुठा नदीकाठी पेठांमधील जुन्या वाड्यांमध्ये, चाळींमध्ये वास्तव्यास होते. पुरामुळे पेठा जलमय झाल्या. घरे, माणसे आणि गुरे वाहून गेली. सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. पुण्याची पूर्णत: वाताहत झाली. हे मातीचे धरण का आणि कसे फुटले? अभियंते आणि राजकीय व्यक्तींना या धोक्याची पूर्वकल्पना आली नव्हती का? तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ही युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळली आणि पूरग्रस्तांचे पुनर्वसन कसे झाले या सर्व प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या कादंबरीचे लेखन प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका आश्लेषा महाजन यांनी केले आहे.

पानशेत धरण फुटल्याच्या घटनेला सोमवारी (दि. १२) साठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून ‘इंकिंग इनोव्हेशन्स’ने प्रकाशित केलेल्या ’१२ जुलै १९६१’ या कादंबरीचे प्रकाशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते आॅनलाइन स्वरूपात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आणि नगरसेविका अश्विनी कदम या वेळी उपस्थित राहणार आहेत.

आश्लेषा महाजन म्हणाल्या, पानशेत पुराला पन्नास वर्षे झाली, तेव्हापासून मी या कादंबरी लेखनावर काम करीत होते. त्याला दहा वर्षे झाली. पूरग्रस्त आणि पुराशी संबंधित शंभराहून अधिक लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अनुभव वाचकांना रुचेल अशा स्वरूपात कादंबरीमध्ये मांडले आहेत. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी या कादंबरीविषयी दिलेला अभिप्राय मलपृष्ठावर देण्यात आला आहे. पानशेत धरण फुटल्याच्या घटनेनंतर त्या वर्षीच्या दिवाळी अंकांमध्ये स्फुट लेख प्रसिद्ध झाले होते. मात्र, तत्कालीन पोलीस अधिकारी मधुकर हेबळे यांनी लिहिलेल्या ‘पानशेत प्रलय आणि मी’ या व्यक्तिगत अनुभवांवर आधारित पुस्तकाचा अपवाद वगळता पुण्याला हादरवून टाकणाऱ्या या घटनेवर मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली नाही.

----------------------------------------------