शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

कादंबरीमध्ये पानशेत धरणफुटीचा मागोवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले आणि सर्वत्र हाहाकार माजला. त्या काळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले आणि सर्वत्र हाहाकार माजला. त्या काळी छोट्या असलेल्या पुण्यातील लोक मुठा नदीकाठी पेठांमधील जुन्या वाड्यांमध्ये, चाळींमध्ये वास्तव्यास होते. पुरामुळे पेठा जलमय झाल्या. घरे, माणसे आणि गुरे वाहून गेली. सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. पुण्याची पूर्णत: वाताहत झाली. हे मातीचे धरण का आणि कसे फुटले? अभियंते आणि राजकीय व्यक्तींना या धोक्याची पूर्वकल्पना आली नव्हती का? तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ही युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळली आणि पूरग्रस्तांचे पुनर्वसन कसे झाले या सर्व प्रश्नांचा मागोवा घेणाऱ्या कादंबरीचे लेखन प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका आश्लेषा महाजन यांनी केले आहे.

पानशेत धरण फुटल्याच्या घटनेला सोमवारी (दि. १२) साठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून ‘इंकिंग इनोव्हेशन्स’ने प्रकाशित केलेल्या ’१२ जुलै १९६१’ या कादंबरीचे प्रकाशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते आॅनलाइन स्वरूपात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आणि नगरसेविका अश्विनी कदम या वेळी उपस्थित राहणार आहेत.

आश्लेषा महाजन म्हणाल्या, पानशेत पुराला पन्नास वर्षे झाली, तेव्हापासून मी या कादंबरी लेखनावर काम करीत होते. त्याला दहा वर्षे झाली. पूरग्रस्त आणि पुराशी संबंधित शंभराहून अधिक लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अनुभव वाचकांना रुचेल अशा स्वरूपात कादंबरीमध्ये मांडले आहेत. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी या कादंबरीविषयी दिलेला अभिप्राय मलपृष्ठावर देण्यात आला आहे. पानशेत धरण फुटल्याच्या घटनेनंतर त्या वर्षीच्या दिवाळी अंकांमध्ये स्फुट लेख प्रसिद्ध झाले होते. मात्र, तत्कालीन पोलीस अधिकारी मधुकर हेबळे यांनी लिहिलेल्या ‘पानशेत प्रलय आणि मी’ या व्यक्तिगत अनुभवांवर आधारित पुस्तकाचा अपवाद वगळता पुण्याला हादरवून टाकणाऱ्या या घटनेवर मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली नाही.

----------------------------------------------