शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

फिरायला गेलेले पर्यटक पैशाअभावी अडचणीत

By admin | Updated: November 10, 2016 02:14 IST

आपल्या आवडत्या ठिकाणी पर्यटनासाठी गेला आहात, तिथे मिळणाऱ्या छान वस्तू घ्यायच्या आहेत, खिशात पैसेही आहेत, पण त्या पैशाची किंमत बाजारामध्ये गेल्यावर शून्य आहे

पुणे : आपल्या आवडत्या ठिकाणी पर्यटनासाठी गेला आहात, तिथे मिळणाऱ्या छान वस्तू घ्यायच्या आहेत, खिशात पैसेही आहेत, पण त्या पैशाची किंमत बाजारामध्ये गेल्यावर शून्य आहे हे कळल्यावर काय भावना होईल? तशीच काहीशी अवस्था महाराष्ट्राबाहेर फिरायला गेलेल्या पर्यटकांची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चलनव्यवहारातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाच रद्द केल्याने पर्यटकांसाठी पैसा एका क्षणात ‘खोटा’ ठरला आहे. त्यामुळे पर्यटकांना ‘नो खरेदी’ धोरण अवलंबून केवळ फिरण्याचा आनंद लुटावा लागत आहे. दिवाळीत किंवा त्यानंतर पर्यटनाला जाण्याचा एक टे्रंड गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झाला आहे. पर्यटनाला कुठे जायचे, याचे नियोजन कुटुंबामध्ये दिवाळीपूर्वीच एकदोन महिने अगोदर केले जाते. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी भारतातील विविध स्थळांना भेटी देण्यासाठी वैयक्तिक किंवा ट्रूर्स कंपन्यांबरोबर कुटुंबाची स्वारी निघते, यंदाही अगदी सिमला, कुलू-मनालीपासून अमृतसर, डलहौसी, धरमशाळा, राजस्थान, केरळ, दार्जिलिंग या ठिकाणी पर्यटनासाठी लोक गेलेले आहेत. मात्र, मोदींच्या या निर्णयामुळे पर्यटकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. पर्यटनासाठी जाताना खिशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा घेऊन गेलेल्या पर्यटकांसाठी या नोटा एका झटक्यात ‘कागदी’ ठरल्या आहेत. बाजारात खरेदीसाठी गेल्यानंतर विक्रेते ५०० रुपयांच्या नोटा नाकारात आहेत, हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर तीच परिस्थिती अनुभवास मिळत आहे. करायचे तरी काय? असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे. हैद्राबादला गेलेल्या एका प्रवाशाने आपला अनुभव कथन केला. या निर्णयानंतर दुकानात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केले आणि एटीएमच्या बाहेर रांगा लागायला सुरूवात झाली. वाहतूक कंपन्यानीही ५०० रुपयांच्या नोटा घेणे नाकारले. खिशात १०० रुपायांच्या नोटा कमी असल्यामुळे आम्हाला जपून खर्च करावा लागत आहे. कार्डनेच पेमेंट करा, असा आग्रह दुकानदारांकडून होत आहेत. आमच्या काहीजणांच्या खात्यात एवढी रक्कम नाही. त्यामुळे जेवणासाठी एका हॉटेलवाल्याला पैसे गोळा करून देण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.