शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

मोसे खोऱ्यात वाढणार पर्यटन

By admin | Updated: June 2, 2017 01:53 IST

वरसगाव धरण परिसरातील दुर्गम भागातील रस्ते ताम्हिणी घाट तसेच कोकणाला जोडणार असल्याने या भागात पर्यटनाला

लोकमत न्यूज नेटवर्कपिरंगुट : वरसगाव धरण परिसरातील दुर्गम भागातील रस्ते ताम्हिणी घाट तसेच कोकणाला जोडणार असल्याने या भागात पर्यटनाला चालना मिळणार आहे. या परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या परिसरातील नागरिकांचा विकास यामुळे होणार आहे. यासाठी या भागातील पानशेत धरणमार्गे साई खुर्द, मोशे खुर्द व ताम्हिणी रस्त्याची सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे यांनी नुकतीच पाहणी केली.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वरसगाव धरण परिसरातील रस्त्यांचा विकास हा रखडला आहे. यामुळे हा परिसर विकासापासून वंचित राहिला आहे. पावसाळ्यात अतिपर्जन्यमानामुळे या परिसराचा संपर्क तुटतो. यामुळे या परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मात्र या परिसराच्या विकासासाठी वरसगाव धरण भागातील दुर्गम रस्ते ताम्हिणी घाटमार्गे कोकणाला जोडली जाणार आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या उंच डोंगररांगातील या परिसरात पर्यटनास चालना मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने या भागातील पानशेत धरणमार्गे साई खुर्द, मोशे खुर्द व ताम्हिणी रस्त्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर केलेले आहे. या रस्त्यामुळे ऐतिहासिक मोसे खोऱ्यातील तव (ता. मुळशी), गडले, साई खुर्द, सांडघर, धडवली आदी खेड्यातील मावळ्यांना पर्यटनामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने चालू आर्थिक अंदाजपत्रकात खास बाब म्हणून या निधीस मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राहणे यांनी वरसगाव धरणाच्या डाव्या तीरावरील माथ्यापासून सुरू होणाऱ्या या रस्त्याची साई खुर्दमार्गे थेट तव गाव (ता. मुळशी) पर्यंत पाहणी केली. कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, मुळशी विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल शिंदे तसेच शाखा अभियंता धनराज दराडे, यांच्यासह तव गावच्या सरपंच पल्लवी लालासाहेब पासलकर, तवचे सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब पासलकर व आदींसह स्थानिक नागरिक पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. उपविभागीय अभियंता अनिल शिंदे म्हणाले पानशेतजवळील साई खुर्दमार्गे तव गाव ते ताम्हिणी घाट असा हा ५७ किमीचा रस्ता आहे. राज्य सरकारने चालू आर्थिक अंदाजपत्रकात त्यासाठी नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामध्ये पानशेत धरणमार्गे साईव खुर्द सांडवघर, मोसे खुर्द, धडवली ते तवगाव अशा मार्गे हा रस्ता असेल व कालांतराने तवगाव ते वडवली, साघरी, गडले, धामणओळ, मुगाव मार्गे ताम्हिणीला जोडणार आहे.रस्त्याच्या नियोजित कामांची कार्यवाही सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कामांचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. निविदा मंजूर झाल्यावर पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाची सुरुवात केली जाणार आहे. वरसगाव धरणाच्या डाव्या तीरावरील उंच डोंगरावर असलेल्या तव, मोसे खुर्द, सांडवघर आदी दुर्गम भागातील खेडोपाडी गावांमध्ये जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांची पावसाळ्यात मोठी गैरसोय होते. वरसगाव धरणाच्या उजव्या तीरावरील दासवे येथे आलिशान लवासा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांचा विकास झाला आहे.