शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

पर्यटन कंपन्यांनी ग्राहकांच्या कोट्यवधी रुपयांना ठोकले टाळे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : टाळेबंदी (लॉकडाऊन) काळात बाहेर पडण्यास मज्जाव असल्याने नागरिकांना पर्यटनासाठी जाता आले नाही. आता उन्हाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : टाळेबंदी (लॉकडाऊन) काळात बाहेर पडण्यास मज्जाव असल्याने नागरिकांना पर्यटनासाठी जाता आले नाही. आता उन्हाळी पर्यटनाचा दुसरा हंगाम आला तरी अनेक पर्यटन संस्थांनी रद्द झालेल्या सहलीचे कोट्यवधी रुपये पर्यटकांना परत दिले नाहीत. पैसे परत मिळावे यासाठी पर्यटकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहक आयोगाकडे तक्रार केली आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च-२०२० मध्ये देशात टाळेबंदी जाहीर केली. संपूर्ण जनजीवन ठप्प पडले. त्यावेळी पर्यटनाचा हंगाम होता. त्यासाठी अनेकांनी पर्यटन कंपन्यांच्या माध्यमातून देश-परदेशात पर्यटनासाठी अगाऊ आरक्षण केले होते. साथीच्या रोगामुळे सहली झाल्या नाहीत. पर्यटन कंपन्यांनी त्याचे पैसे परत देणे आवश्यक होते. अनेक कंपन्यांनी नऊ-दहा महिन्यांनंतरही पैसे परत दिले नाहीत.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे विविध २२ कंपन्यांच्या तक्रारी आल्या आहेत. ग्राहक मंचाच्या माध्यमातून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दावा दाखल केला आहे. आयोगाने त्यावर येत्या २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.कोट विविध पर्यटक कंपन्यांना ग्राहकांनी २.२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिलेली आहे. कोरोनाच्या साथरोग काळात सर्व पर्यटन ठप्प झाले. या काळातील रक्कम व्याजासह मिळावी यासाठी ग्राहक मंचाने संबंधित कंपन्यांना नोटीस पाठविली होती. अनेकांनी त्याला उत्तर दिले नाही. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दावा दाखल केला आहे.- विजय सागर, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगरकोट एका टूर्सच्या माध्यमातून एप्रिल-मे २०२० मध्ये युरोपात सहलीसाठी जाणार होतो. टाळेबंदीमुळे यात्रा रद्द झाली. कंपनीला मेलद्वारे भरलेले पैसे देण्याची मागणी केली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर भरलेल्या पैशांपैकी २५ हजार रुपये प्रशासकीय खर्च म्हणून कापला. उरलेल्या पैशांच्या माध्यमातून डिसेंबर २०२० अखेरीस सहल आखण्यास सांगण्यात आले. मात्र, तोपर्यंत कोरोनाची स्थिती निवळली नव्हती. तसेच, परिस्थिती बदलल्याने आता पर्यटनाचा बेत रद्द झाला आहे. त्यामुळे कंपनीने पैसे देणे अपेक्षित होते. त्यासाठी ग्राहक मंचाच्या माध्यमातून दावा दाखल केला आहे.- चंद्रहास कुलकर्णी, पर्यटक