शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

टोमॅटोवर तिरंगा, तर उसावर हुमणी!

By admin | Updated: October 4, 2016 01:37 IST

मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. टोमॅटोवर तिरंगा रोगाने थैमान घातल्याने

बारामती : मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. टोमॅटोवर तिरंगा रोगाने थैमान घातल्याने अक्षरश: टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. या रोगावर कोणताही उपाय चालत नसल्याने शेतकऱ्याला एकरी दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. इंदापूर तालुक्यातील लासुर्णे, निमगाव केतकी, अंथुर्णे परिसरात टोमॅटोचे पीक घेण्यात येते. टोमॅटोच्या रोपापासून, ते मल्चिंग पेपरवरील लागवड, झाडांना आधार देण्यासाठी तार-काठी, लागवडीची मजुरी यावर शेतकऱ्यांनी १ लाख रुपयांच्या वर खर्च केला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून परिसरात पाऊस पडत आहे. सलग पडणाऱ्या या पावसामुळे टोमॅटोवर फळमाशी व तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेकडो किलो टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या रोगावर कोणत्याही प्रकारच्या फवारणीचा उपयोग होत नाही. खराब वातावरणामुळे रोग वाढत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक रोगाने नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यात टोमॅटोचे भाव निचांकी पातळीवर आले आहेत. त्यामुळे रोग व कमी दरामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.बारामती : इंदापूर, बारामती तालुक्याच्या माळेगाव आणि भवानीनगर परिसरात ऊसपिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. भवानीनगर येथील श्री छत्रपती कारखान्याच्या २ ते ५ टक्के कार्यक्षेत्रामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील ऊसपीक अडचणीत आले आहे. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यापासून हुमणी किडीचा प्रादुर्भाव ऊसपिकावर आढळून येत आहे. अगोदरच अपुऱ्या पर्जन्यमानाचा फटका ऊसक्षेत्राला बसला आहे. त्यातच आता हुमणीचादेखील काही प्रमाणात परिणाम झाला आहे.‘छत्रपती’च्या कार्यक्षेत्रातील सणसर, लासुर्णेसह मुरमाड जमिनीत असणाऱ्या कार्यक्षेत्रात ऊसपिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील ऊसपीक पूर्णपणे अडचणीत आले आहे. सध्या सुरू झालेल्या पावसामुळे हुमणीच्या प्रादुर्भावामध्ये घट झाली आहे. उसाच्या मुळाशी या किडीची लागण होते. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ऊसपीक सोडून द्यावे लागते. ही कीड उसाच्या मुळ्या खाऊन टाकते. त्यामुळे पोषणाअभावी ऊस जळून जातो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.याबाबत कृषिविज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी सांगितले, की शेती नांगरटीच्या काळात बगळे, इतर पक्षी येतात. या वेळी जमिनीवर आलेल्या सुप्त अवस्थेतील अळ्या, कोष खातात. पहिल्या पावसानंतर जमिनीतून भुंगेरे वर येतात. संध्याकाळी हे भुंगेरे बांधावरील सुबाभूळ, लिंंब इतर काटेरी झाडांवर चढतात. रात्री झाडावर नरमादींचे मिलन होते. सूर्याेदयापूर्वी हे भुंगेरे परत जमिनीत जातात. त्यानंतर मादी जमिनीत अंडी घालते. अंड्यांची संख्या त्या ठिकाणावर अवलंबून असते. सुमारे ३५ ते ५० अंडी असतात. त्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भाव टाळण्यासाठी बांधांवरील झाडांवर कीटकनाशक फवारणी, धुरळणी करावी अथवा झाडांवर भ्ांुगेरे बसण्याची सायंकाळी प्रतीक्षा करावी. त्यानंतर झाड हलवून खाली पडलेले भुंगेरे रॉकेलमिश्रित पाण्यात टाकावेत. तसेच, प्रकाश सापळे लावल्यास तेथे भुंगेरे एकत्र येतात. खाली घमेल्यात औषधमिश्रित पाण्यात पडून हे भुंगेरे मृत्युमुखी पडतात. याशिवाय, शेणखतामध्ये मेटारायझियम अनीसोपित्ती किंवा बिव्हेरिया बासियाना या जैविक बुरशी ८ किलो एकरी या प्रमाणात शेणखताबरोबर पसराव्यात. त्यामुळे अंड्याला बुरशी लागण होउन हुमणी, वाळवी नष्ट होण्यास मदत होते. (प्रतिनिधी)