शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक महामार्ग पूर्ण होईपर्यंत चाळकवाडीत टोलनाका सुरू करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:13 IST

नारायणगाव : स्थानिक नागरिकांनी प्रखर विरोध व आंदोलन केल्यानंतर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाळकवाडी येथील टोल नाका बंद करण्यात आला ...

नारायणगाव : स्थानिक नागरिकांनी प्रखर विरोध व आंदोलन केल्यानंतर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाळकवाडी येथील टोल नाका बंद करण्यात आला होता. मात्र कामे अर्धवट असताना पुन्हा एकदा हा टोलनाका सुरू केला जात आहे. जोपर्यंत पुणे-नाशिक महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होत नाही, तोपर्यंत चाळकवाडीचा टोल नाका सुरू करु नये, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया) मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंह आणि प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

टोलनाक्याच्या मुद्द्यावर खा.डॉ. कोल्हे म्हणाले की, पुणे-नाशिक महामार्गावरील बहुतेक ठिकाणी बाह्यवळण रस्ते आणि अन्य कामे अर्धवट असताना टोलवसुली केली जात होती. अखेर स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवीत तीव्र आंदोलन केल्यानंतर चाळकवाडी येथील टोल नाका बंद करण्यात आला होता. दरम्यान, नारायणगाव आणि खेड घाटातील बाह्यवळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चार बाह्यवळण रस्त्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. अशा स्थितीत स्थानिक नागरिकांनी जोपर्यंत महामार्गावरील काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होत नाही, तोपर्यंत जुन्नर येथील चाळकवाडी टोलनाका उभारणीला जोरदार विरोध दर्शविला आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उद्यापासून (दि. १) चाळकवाडी येथील टोलनाका पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात येणार आहे.