शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टोलवसुली करता; मग रस्ते दुरुस्ती कधी?

By admin | Updated: March 21, 2017 05:01 IST

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ या रस्त्यावर नुकताच मिनीबस व मालवाहू ट्रक यांचा उरुळी कांचनजवळ भीषण अपघात

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ या रस्त्यावर नुकताच मिनीबस व मालवाहू ट्रक यांचा उरुळी कांचनजवळ भीषण अपघात होऊन त्यात ११ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर या दुरवस्थेची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. जेथे अपघात झाला त्याठिकाणी सातत्याने अपघात होऊन अनेकांना मरणयातना भोगाव्या लागतात. पण त्या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा असा फलक व धोक्याची सूचना देणारा रेड लाईट सिग्नल बसविणे गरजेचे असताना कोणताही अधिकारी याबाबत कर्तव्यतत्परता दाखवत नाही हीच खरी शोकांतिका आहे. संबंधितांनी त्वरित लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नूतन जिल्हा परिषद सदस्या कीर्ती अमित कांचन यांनी केली आहे. आणखी किती लोकांचे बळी या कंपनीला व शासनाच्या अधिकाऱ्यांना अपेक्षित आहेत, असा सवाल या भागातील जनता विचारू लागली आहे.पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट (ता. हवेली) ते कासुर्डी फाटा (ता. दौंड) या भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी खचलेल्या साईडपट्ट्या अपघाताला कारणीभूत ठरून अनेकांना आपले प्राण गमाविण्याची वेळ आली. तरीही त्याकडे महामार्ग व्यवस्थापन व आयआरबी ही रस्ता बांधणी करणारी खाजगी कंपनी संगनमताने दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप मावळते जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे यांनी केला आहे.महामार्ग व सेवामार्ग यांच्यामधील सुरक्षा म्हणून उभारण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या बऱ्याच ठिकाणी नाहीशा झाल्या आहेत. महामार्गाच्या दुभाजकावर बसविण्यात आलेल्या प्रकाशनियंत्रकांचे वेगवेगळ्या अपघातांमध्ये झालेल्या तुटफुटीची दुरुस्ती न करण्याने रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रकाशझोताने वाहनचालकांना त्रास होतो. पुणे-सोलापूर महामार्गाची टोलवसुली पट्ट्यात कमालीची दुरवस्था झाली असून, टोलवसुली कंपनीचे दुर्लक्षच यामुळेच अशी अवस्था या रस्त्याची झाली असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.