शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

टोलनाक्याचा विरोध मावळला

By admin | Updated: February 18, 2017 02:58 IST

पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाक्यावर टोल सुरू करण्यास बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. अगोदर

पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाक्यावर टोल सुरू करण्यास बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. अगोदर सर्व समस्या सोडवा आणि मगच टोल सुरू करा,अशी ठोस भूमिका घेतल्याने हा टोलनाका सुरू होईल, की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तत्काळ कामे मार्गी लावल्यामुळे या टोलनाक्यावर गुरुवारी (दि. १६) मध्यरात्री बारा वाजल्यापासून टोल आकारणी करण्यास सुरुवात केली असून, स्थानिक नागरिकांना या टोलमधून सवलत देण्यात आली आहे.पुणे-नाशिक महामार्गाचे राजगुरुनगर ते सिन्नर या दरम्यान रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या एकून १३८ किलोमीटर पैकी फक्त १०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. कामाच्या ७५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर टोलनाका सुरू करण्याचा नियम असल्यामुळे या कामास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला होता; त्यामुळे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा आणि जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथील टोलनाका शनिवार (दि.११) पासून सुरू करण्यात येणार होता. परंतु, येथील बाधित शेतकऱ्यांचे आणि आळे येथील ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे उपविभागीय अधिकारी व आयएलएफएसचे अधिकारी यांनी शेतकरी व आळे ग्रामस्थांबरोबर आळेफाटा येथील सावतामाळी मंदिरात बैठक घेतली. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. आळे येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात यावे, पिंपळवंडी येथील स्मशानभूमीची कामे करा आणि मगच टोल आकारणी करण्यास सुरुवात करा, अशी ठोस आणि आक्रमक भूमिका घेतल्यामुळे टोल आकारणी बंद करण्यात आली होती. येथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दणका दिल्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने आळे येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम पिंपळवंडी येथील स्मशानभूमीचे व पिंपळवंडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास सुरुवात केल्यामुळे हा टोलनाका सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.