शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

विमानतळाविरोधात पुरंदरच्या सात गावांचा आज मोर्चा

By admin | Updated: October 13, 2016 02:19 IST

पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे राजेवाडी, वाघापूर, आंबळे, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या गावांनी विमानतळाला विरोध

राजेवाडी : पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे राजेवाडी, वाघापूर, आंबळे, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या गावांनी विमानतळाला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर, या सर्व गावांतील ग्रामस्थ उद्या (दि. १३) जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकणार आहेत. सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसभेचे ठराव जिल्हाधिकारी सौरभ राव यांना प्रत्यक्ष देऊन ‘विमानतळ आम्हाला नको. ज्यांना गरज आहे त्यांना विमानतळ द्या,’ असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. विमानतळाला आम्ही इंचभर जमीन देणार नसल्याचे ठरावात नमूद केले आहे. सातही गावांतील शेतकरी, महिला, तरुण शेतकरी, लहान मुले या मोर्चात सहभागी होतील. पुरंदर तालुका कायम दुष्काळी होता; मात्र पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे राजेवाडी, पारगाव पंचक्रोशीत बारमाही बागायती जमिनी झाल्या असून, दुष्काळी भागातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता लाखो रुपये उसनवारीने बँकेकडून घेऊन शेती सुधारून फळबागा, फुलबागा लावून, रात्रंदिवस काबाडकष्ट करून लाखो रुपये कमवायला सुरुवात केली आहे. अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरू यासारख्या फळबागा लावून उत्पन्न कमवू लागले असताना शासनाने हा विमानळाचा नवा घाट घातल्याची ग्रामस्थांची भावना आहे. पुरंदर तालुक्यात विमानतळाची गरज नसताना उगाच हे भूत शेतकऱ्यांच्या माथी मारू नये व शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा ग्रामसभेत संताप नोंदविला आहे. हा मोर्चा गुरुवारी असल्याने राजेवाडीचा आठवडेबाज बंद राहणार असल्याचे सरपंच पुष्पांजली बधे यांनी सांगितले. (वार्ताहर)