शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

मुख्यमंत्र्यांची ३४ गावांच्या समावेशाबद्दल आज बैठक

By admin | Updated: June 21, 2017 06:23 IST

महापालिकेलगतच्या ३४ गावांचा पालिकेत समावेश करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेलगतच्या ३४ गावांचा पालिकेत समावेश करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. उच्च न्यायालयात गावांच्या समावेशाबाबत अंतिम प्रतिज्ञापत्र शासनाला सादर करावयाचे आहे, त्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला ग्रामीण विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरविकास विभागाचे संचालक आणि लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पायाभूत सुविधांचा अभाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा विचार करता ही गावे त्वरित महापालिकेत समाविष्ट करणे योग्य ठरेल, असा अहवाल शासनाला दिला आहे. त्यामुळे आता राज्य शासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शासनाने २४ मे २०१५ मध्ये हद्दीलगतची ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना मागवून सुनावणी घेण्यात आली. मात्र या निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने हद्दीलगतच्या गावातील ग्रामस्थांनी ३४ गावांचा तातडीने महापालिकेत समावेश करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान याबाबत राज्य शासन अनुकूल असल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालयात सादर केले. त्यानुसार गावांचा समावेश करण्याबाबतचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.