शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मुख्यमंत्र्यांची ३४ गावांच्या समावेशाबद्दल आज बैठक

By admin | Updated: June 21, 2017 06:23 IST

महापालिकेलगतच्या ३४ गावांचा पालिकेत समावेश करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेलगतच्या ३४ गावांचा पालिकेत समावेश करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. उच्च न्यायालयात गावांच्या समावेशाबाबत अंतिम प्रतिज्ञापत्र शासनाला सादर करावयाचे आहे, त्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला ग्रामीण विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरविकास विभागाचे संचालक आणि लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पायाभूत सुविधांचा अभाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा विचार करता ही गावे त्वरित महापालिकेत समाविष्ट करणे योग्य ठरेल, असा अहवाल शासनाला दिला आहे. त्यामुळे आता राज्य शासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शासनाने २४ मे २०१५ मध्ये हद्दीलगतची ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना मागवून सुनावणी घेण्यात आली. मात्र या निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने हद्दीलगतच्या गावातील ग्रामस्थांनी ३४ गावांचा तातडीने महापालिकेत समावेश करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान याबाबत राज्य शासन अनुकूल असल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालयात सादर केले. त्यानुसार गावांचा समावेश करण्याबाबतचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.