शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

भीमा नदीमध्ये आज पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:17 IST

शिरूर व हवेली तालुक्यात भीमा नदीकाठावरील गावात तीव्र पाणीटंचाई झाली होती.

लोणीकंद : शिरूर व हवेली तालुक्यात भीमा नदीकाठावरील गावात तीव्र पाणीटंचाई झाली होती. तसेच, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने नागरिकांच्या पाण्याच्या मागणीबाबत पालकमंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, भीमा नदीवरील बंधारे भरण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली.या निर्णयामुळे हवेली-शिरूर तालुक्यात नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आमदार पाचर्णे म्हणाले, ‘भीमा नदीकाठच्या बहुतांश गावांच्या पाणी योजना, तसेच जवळच्या गावांच्याही पिण्याच्या पाण्याच्या योजना कोल्हापूर बंधाऱ्यावर अवलंबून असल्याने पाण्याअभावी योजना बंद पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाण्याअभावी उभी पिके ही जळून जाण्याची भीती असल्याने भीमा नदीत त्वरित पाणी सोडण्याची मागणी नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.’ भामा आसखेड धरणातील पाणीसाठ्यातून पाणी सोडल्यास खेड, हवेली, शिरूर व दौंड तालुक्यांतील शेतकऱ्यांना फायदा होईल, यासाठी आमदार पाचर्णे यांनी पाणी सोडण्याबाबत पालक मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य दादासाहेब सातव, संजय सातव पाटील, संदीप भोंडवे, आदीनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.> सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांची गरज लक्षात घेऊन आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधीक्षक अभियंता चोपडे यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले असून उदयापासून (सोमवार) पाणी सोडण्यात येणार आहे.- बाबूराव पाचर्णे, आमदार