शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भीमा नदीमध्ये आज पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:17 IST

शिरूर व हवेली तालुक्यात भीमा नदीकाठावरील गावात तीव्र पाणीटंचाई झाली होती.

लोणीकंद : शिरूर व हवेली तालुक्यात भीमा नदीकाठावरील गावात तीव्र पाणीटंचाई झाली होती. तसेच, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने नागरिकांच्या पाण्याच्या मागणीबाबत पालकमंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, भीमा नदीवरील बंधारे भरण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली.या निर्णयामुळे हवेली-शिरूर तालुक्यात नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आमदार पाचर्णे म्हणाले, ‘भीमा नदीकाठच्या बहुतांश गावांच्या पाणी योजना, तसेच जवळच्या गावांच्याही पिण्याच्या पाण्याच्या योजना कोल्हापूर बंधाऱ्यावर अवलंबून असल्याने पाण्याअभावी योजना बंद पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाण्याअभावी उभी पिके ही जळून जाण्याची भीती असल्याने भीमा नदीत त्वरित पाणी सोडण्याची मागणी नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.’ भामा आसखेड धरणातील पाणीसाठ्यातून पाणी सोडल्यास खेड, हवेली, शिरूर व दौंड तालुक्यांतील शेतकऱ्यांना फायदा होईल, यासाठी आमदार पाचर्णे यांनी पाणी सोडण्याबाबत पालक मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य दादासाहेब सातव, संजय सातव पाटील, संदीप भोंडवे, आदीनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.> सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांची गरज लक्षात घेऊन आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधीक्षक अभियंता चोपडे यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले असून उदयापासून (सोमवार) पाणी सोडण्यात येणार आहे.- बाबूराव पाचर्णे, आमदार