शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीमध्ये आज पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:17 IST

शिरूर व हवेली तालुक्यात भीमा नदीकाठावरील गावात तीव्र पाणीटंचाई झाली होती.

लोणीकंद : शिरूर व हवेली तालुक्यात भीमा नदीकाठावरील गावात तीव्र पाणीटंचाई झाली होती. तसेच, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने नागरिकांच्या पाण्याच्या मागणीबाबत पालकमंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, भीमा नदीवरील बंधारे भरण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली.या निर्णयामुळे हवेली-शिरूर तालुक्यात नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आमदार पाचर्णे म्हणाले, ‘भीमा नदीकाठच्या बहुतांश गावांच्या पाणी योजना, तसेच जवळच्या गावांच्याही पिण्याच्या पाण्याच्या योजना कोल्हापूर बंधाऱ्यावर अवलंबून असल्याने पाण्याअभावी योजना बंद पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाण्याअभावी उभी पिके ही जळून जाण्याची भीती असल्याने भीमा नदीत त्वरित पाणी सोडण्याची मागणी नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.’ भामा आसखेड धरणातील पाणीसाठ्यातून पाणी सोडल्यास खेड, हवेली, शिरूर व दौंड तालुक्यांतील शेतकऱ्यांना फायदा होईल, यासाठी आमदार पाचर्णे यांनी पाणी सोडण्याबाबत पालक मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य दादासाहेब सातव, संजय सातव पाटील, संदीप भोंडवे, आदीनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.> सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांची गरज लक्षात घेऊन आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधीक्षक अभियंता चोपडे यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले असून उदयापासून (सोमवार) पाणी सोडण्यात येणार आहे.- बाबूराव पाचर्णे, आमदार