शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

पाणी हापसून आता थकलो!

By admin | Updated: May 8, 2017 02:21 IST

हातपंपाचे पाणी हापसून हापसून आता थकलो... दिवसभरात कसेबसे चार हंडे पदरात पडतात... अशा भावना व्यक्त केल्या. भोर तालुक्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : हातपंपाचे पाणी हापसून हापसून आता थकलो... दिवसभरात कसेबसे चार हंडे पदरात पडतात... अशा भावना व्यक्त केल्या. भोर तालुक्यातील शिरोली गावातील महिलांनी. शिरवली हिर्डोस मावळ गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठा योजना नसून कुठेच पाणी उपलब्ध नाही. एका हातपंपावर नंबर लावून पाणी भरले जाते. खर्चाच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र अद्याप टँकर सुरू झालाच नाही. पाणी हापसून महिलांना खांदेदुखी व अंगदुखीचे आजार उद्भवत आहेत.भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर धरण भागात दरवर्षी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो आणि पाणी डोंगरावरून वाहून जाते. धरण भरते आणि पुन्हा रिकामे होते. धरणाच्या काठावरील शिरवली गावात १५ वर्र्षांपासून उन्हाळ््यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठ्याची योजना राबवली गेली नाही. एक हातपंप आहे, मात्र मार्च महिन्यानंतर त्याला पाणी कमी पडत असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या वतीने रणजित शिवतरे यांनी पाणी साठवण्यास टाक्या आणि खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला तो टँकर अधूनमधून येत असल्याने पाण्याचा थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळत आहे. पाण्यावाचून महिलांचे होताहेत हाल गावाजवळचे ढवरे आटले असून जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने तीन किलोमीटरवर असलेल्या नीरादेवघर धरणावरून डोक्यावरून किंवा पिक-अप जीपने विकत पाणी आणावे लागत असल्याने तेथील महिलांचे पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू आहेत.रिंगरोडला लागून असलेल्या हातपंपाला थोड्याफार प्रमाणात पाणी येत असल्याने दिवसभर रांगा लावून तासाला चार हंडे याप्रमाणे हापसून पाणी भरावे लागत आहे. दरवर्षी उन्हाळ््यात हेच काम करावे लागत असल्याने जीव कासावीस होत असल्याचे येथील महिला सांगतात. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.