शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

धरणातला गाळ ठरतोय पाण्यासाठी काळ

By admin | Updated: February 3, 2016 01:41 IST

कित्येक दशकांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांमधील गाळ काढलेला नसल्याने धरणांच्या साठवण क्षमतेत मोठी घट झाली आहे

पुणे : कित्येक दशकांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांमधील गाळ काढलेला नसल्याने धरणांच्या साठवण क्षमतेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईने अनेक गावे तहानलेली असताना धरणांतील गाळच पाण्यासाठी काळ ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे. जलसंधारणासाठी एकीकडे राज्यशासनातर्फे जलयुक्त शिवारसारख्या योजना राबविल्या जात आहेत. मात्र, पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या जिल्ह्यातील धरणातील गाळ गेल्या कित्येक दशकांपासून काढला गेलेला नाही. पुणे जिल्ह्यात जवळपास २५ धरणे आहेत. या धरणांमुळे मोठे क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील धरणे अहमदनगर जिल्ह्यासाठी, तर उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, गेल्या काही दशकांत या धरणात गाळ साचल्याने साठवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. राज्य शासन एकीकडे जलसंधारणासाठी अनेक मोहिमा तसेच योजना राबवीत आहेत. सध्या जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात राबविली गेली आहे. यामुळे भूजलपातळीत वाढ झाली आहे. मात्र पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या धरणातील गाळ काढण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळलेले आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २३ टीमसी आहे. या धरणात जवळपास १० ते १२ टक्के गाळ साठल्याने दोन टीमसी पाणी धरणात कमी साठत असल्याची माहिती पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. नीरा देवघर धरणाची साठवण क्षमता गाळामुळे जवळपास दोन ते चार टक्क्यांनी घटली आहे. शिरूर तालुक्यातील घोड धरणाचीही हीच अवस्था आहे. पुरंदर तालुक्यातील वीर धरणात जवळपास १ टीएमसी गाळ साठला आहे. हा गाळ काढला गेल्यास पुरंदर तालुक्याच्या दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. उजनी धरणात ३४ वर्षांपासून १४.९६ टीएमसी गाळ साठला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे २०११-१२च्या सुमारास उजनीतील गाळ काढण्याच्या प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ‘मेरी’ या नाशिक येथील संस्थेने सन २००२ मधे धरणातील गाळाचा अभ्यास केला. त्या काळात त्या संस्थेच्या अहवालानुसार धरणात ८.५८ टीएमसी गाळ साठल्याचे निदर्शनास आले होते. नोव्हेंबर २०११ मध्ये नवी दिल्ली येथील केंद्रीय जल आयोगाने ‘टुजो विकास’ या संस्थेच्या माध्यमातून, जीपीएस पद्धतीने गाळाचे फेरसर्वेक्षण केले. त्याचा अंतिम अहवाल मार्च २०१२ ला शासनास सादर केला, त्या वेळी धरणात १४.९६ गाळ साठल्याची माहिती पुढे आली. असा मोजतात गाळयाबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाळ घनमीटर पद्धतीमध्ये मोजला जातो. धरणातील गाळाचे सर्वेक्षण करण्यासाठी होडीच्या साहाय्याने एका विशिष्ट मापकाचा वापर करून ते पाण्यात सोडले जाते. त्यानुसार गाळाची मोजणी केली जाते. त्यामुळे पाणीसाठ्याची क्षमता कमी झाली आहे. याशिवाय पाणीसाठा कमी झाला, तर गाळ लांबी-रुंदीमध्ये देखील मोजला जातो. धरण बांधल्यानंतर ५० ते १०० वर्षांच्या कालावधीनंतर धरणांमधील गाळ काढता येतो. तोपर्यंत गाळ काढता येत नाही. आणखी बातम्या पान ८