शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पशुधन विकण्याची वेळ

By admin | Updated: March 4, 2016 00:34 IST

दौंड तालुक्याच्या पूर्वभागातील गावांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा विपरित परिणाम या परिसरातील प्रमुख असलेल्या दुग्ध व्यवसायावर होऊ लागला आहे.

राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्वभागातील गावांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा विपरित परिणाम या परिसरातील प्रमुख असलेल्या दुग्ध व्यवसायावर होऊ लागला आहे. चारा उपलब्ध नसल्याने पशुधन विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.दौंड तालुक्यातील पूर्व भागातील राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, खानवटे या गावांतील शेतकरी शेतीबरोबरच प्रामुख्याने दुग्धव्यवसाय करत आलेला आहे. बहुतांश दुग्धउत्पादक शेतकरी स्वत:च्याच शेतात मका, कडवळ , मेथी घास, हत्ती घास, गिनीगोल ही चारा पिके घेत आलेला आहे. परंतु, गतवर्षी झालेल्या कमी पावसामुळे विहिरी, कूपनलिका व इतर जलस्रोत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आटू लागले आहेत. या भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. त्यामुळे चारा पिके धोक्यात आली आहेत. भीमा नदीच्या पलीकडे असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. राजेगाव परिसरातून मोठ्या प्रमाणावर मका, कडवळ ही चारा पिके या दुष्काळी भागात विकत घेऊन जात आहेत. पशुधन वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करताना शेतकरी हतबल झालेला दिसतोय.