शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

मासेमारी करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: April 25, 2016 01:59 IST

उजनीतील पाणीसाठा कमी होत असल्याने मासेमारी करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

भिगवण : उजनीतील पाणीसाठा कमी होत असल्याने मासेमारी करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. परप्रांतीय कामगारांनी आपले बिऱ्हाड गावाकडे नेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मासेमारीसाठी नावलौकिक असणाऱ्या भिगवण मासे बाजारात पाण्याबरोबरच माशांचाही दुष्काळ पडलेला दिसून येत आहे.पुण्यापासून सोलापूरपर्यंत मासे खवय्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भिगवण गावात आता ग्राहकांना जादा दराने मासे खरेदी करावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण उजनीतील झपाट्याने कमी होत असलेला पाणीसाठा आहे. पाणी कमी असल्याने मासेमारी करणाऱ्या कामगारांना दिवसभर मासेमारी करून माल मिळत नाही. त्यामुळे आपले आणि आपल्या कुटुंबाची गुजराण करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भिगवणला होलसेल भावात मासे खरेदी करणारे व्यापारी दत्ता लोखंडे, अर्जुन जराड, सुभाष चव्हाण, रोहित माडगे यांनीही खरेदीभावात मोठी वाढ झाल्याचे सांगितले. सध्या पाणी उजनीच्या पोटात गेल्याने काही प्रमाणात मिळत असलेले मासे फार दिवस पुरणार नसल्याचे मासेमारी करणारे कामगार राजू तांडेल आणि काटा कामगार संजय काळे यांनी सांगितले. मासे पकडणारा बहुतांश कामगार हा परप्रांतीय असल्यामुळे ते या परिस्थितीत आपल्या गावाकडे परत जात आहेत. याबाबत मासे लिलाव करणारे व्यापारी माऊली नगरे यांनी काट्यावर लिलावासाठी कमी माल येत असल्याचे सांगितले. यामुळे भावात दुपटीने वाढ झाल्याचे सांगितले. २० ते ४० रुपये किलो मिळणारा चिलापी मासा ६० ते ८० रुपयांवर गेला आहे. तर इतर गुगळी, वाम, मरळ, शिंगटा यांचाही भाव दुपटीने वाढल्याचे सांगितले.