शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

पोट भरण्यासाठी तमाशा कलावंतांवर मजुरी करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:10 IST

कोरोनामुळे लाखो रुपयांचे नुकसान : उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर पुणे : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून गावजत्रा बंद असल्यामुळे तमाशा फडांचे लाखो ...

कोरोनामुळे लाखो रुपयांचे नुकसान : उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

पुणे : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून गावजत्रा बंद असल्यामुळे तमाशा फडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तीन हंगाम वाया गेल्यामुळे तमाशातील कलाकारांना उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी तमाशा कलावंत शेतमजुरी, रोजंदारीची कामे करत आहेत. अनेकांना दिवसभर मजुरी करूनही पोटभर अन्न मिळत नसल्याची खंत तमाशा कलावंतांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देशभरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही अनेक गावांतील यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षभरापासून बंद असलेले तमाशा फड यंदा सुरू होण्याची आशा मावळली आहे. विठाबाई भाऊ नारायणगावकर तमाशा फडाचे प्रमुख मोहीत नारायणगावकर म्हणाले की, कोरोनामुळे कलाकारांवर बिगारी काम करण्याची वेळ आली आहे. आमच्या फडात कलाकारांसह एकूण ९० जण आहेत. मात्र, एक वर्षापासून त्यातील अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दसऱ्यापासून ते गुडीपाडव्यापर्यंत आमचे तमाशाचे तीन हंगाम होतात. कोरोनामुळे एकही हंगाम मिळविता आला नाही. अशा परिस्थितीतही कलाकारांना आवश्यक ती सर्व मदत केली. मात्र, अनेक जण उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करत आहेत. २०१६ मध्ये नोटाबंदी झाल्यापासून तमाशा व्यावसायावर संकट कोसळले आहे. त्यानंतर, दुष्काळ, निवडणुका यामुळे व्यवसाय संकटातच होता. कोरोनामुळे व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे.

संगमनेरचे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर म्हणाले की, कोरोनामुळे एक वर्ष वाया गेल्यानंतर यंदा परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा होती, पण पुन्हा रुग्ण वाढले. त्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंत संभाजी कोल्हे म्हणाले की, वर्षभरापासून सरकारला मदतीसाठी आवाहन करत आहोत. मात्र, सरकारने दुर्लक्ष केले आहे. तमाशा बंद असल्यामुळे वर्षभरापासून उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. मुलाकडून मिळणाऱ्या पैशांवरच सध्या पोट भरत आहे. मुलाकडूनही पैसे मिळाले नाही, तर मजुरीच्या कामावर जातो.

सरकारचे दुर्लक्ष

तमाशा कलावंत संकटात असून, त्यांना मदत करावी, यासाठी वारंवार सरकारला निवेदन देण्यात आले. मात्र, तरीही सरकारने अद्याप कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे सरकारच्या मदतीवर विश्वास नसल्याचे कलाकारांनी सांगितले.

ऐन हंगामात तमाशावर संकट

गुडीपाडवा ते बौद्धपौर्णिमा या काळात पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिकमध्ये गावजत्रा, यात्रा यांमुळे तमाशाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, कोरोना रुग्ण वाढू लागल्याने ऐन हंगामातच तमाशा व्यावसायावर संकट कोसळले आहे.

(फोटो - कोंडीराम आवळे)

संपूर्ण आयुष्य तमाशासाठी दिले आहे. ७४व्या वर्षी कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. वगनाट्य लिहिणारा मी कलाकार या संकटाच्या काळात उदरनिर्वाह कसा करू, असा प्रश्न आहे.

- कोंडीराम आवळे, तमाशा कलावंत

(फोटो - रघुवीर खेडकर)

सरकारला मदतीचे आवाहन करूनही काहीही उपयोग झाला नाही. आमच्या फडात १३० कलावंत आहेत. कोरोनामुळे एका वर्षात मोठ्या फडाचे दोन ते अडीच कोटी आणि लहान फडाचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या कलाकार पडेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहेत.

- रघुवीर खेडकर, तमाशा कलावंत

------------------------------------