शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पोट भरण्यासाठी तमाशा कलावंतांवर मजुरी करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:10 IST

कोरोनामुळे लाखो रुपयांचे नुकसान : उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर पुणे : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून गावजत्रा बंद असल्यामुळे तमाशा फडांचे लाखो ...

कोरोनामुळे लाखो रुपयांचे नुकसान : उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

पुणे : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून गावजत्रा बंद असल्यामुळे तमाशा फडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तीन हंगाम वाया गेल्यामुळे तमाशातील कलाकारांना उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी तमाशा कलावंत शेतमजुरी, रोजंदारीची कामे करत आहेत. अनेकांना दिवसभर मजुरी करूनही पोटभर अन्न मिळत नसल्याची खंत तमाशा कलावंतांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण देशभरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही अनेक गावांतील यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षभरापासून बंद असलेले तमाशा फड यंदा सुरू होण्याची आशा मावळली आहे. विठाबाई भाऊ नारायणगावकर तमाशा फडाचे प्रमुख मोहीत नारायणगावकर म्हणाले की, कोरोनामुळे कलाकारांवर बिगारी काम करण्याची वेळ आली आहे. आमच्या फडात कलाकारांसह एकूण ९० जण आहेत. मात्र, एक वर्षापासून त्यातील अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दसऱ्यापासून ते गुडीपाडव्यापर्यंत आमचे तमाशाचे तीन हंगाम होतात. कोरोनामुळे एकही हंगाम मिळविता आला नाही. अशा परिस्थितीतही कलाकारांना आवश्यक ती सर्व मदत केली. मात्र, अनेक जण उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करत आहेत. २०१६ मध्ये नोटाबंदी झाल्यापासून तमाशा व्यावसायावर संकट कोसळले आहे. त्यानंतर, दुष्काळ, निवडणुका यामुळे व्यवसाय संकटातच होता. कोरोनामुळे व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे.

संगमनेरचे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर म्हणाले की, कोरोनामुळे एक वर्ष वाया गेल्यानंतर यंदा परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा होती, पण पुन्हा रुग्ण वाढले. त्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंत संभाजी कोल्हे म्हणाले की, वर्षभरापासून सरकारला मदतीसाठी आवाहन करत आहोत. मात्र, सरकारने दुर्लक्ष केले आहे. तमाशा बंद असल्यामुळे वर्षभरापासून उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. मुलाकडून मिळणाऱ्या पैशांवरच सध्या पोट भरत आहे. मुलाकडूनही पैसे मिळाले नाही, तर मजुरीच्या कामावर जातो.

सरकारचे दुर्लक्ष

तमाशा कलावंत संकटात असून, त्यांना मदत करावी, यासाठी वारंवार सरकारला निवेदन देण्यात आले. मात्र, तरीही सरकारने अद्याप कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे सरकारच्या मदतीवर विश्वास नसल्याचे कलाकारांनी सांगितले.

ऐन हंगामात तमाशावर संकट

गुडीपाडवा ते बौद्धपौर्णिमा या काळात पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिकमध्ये गावजत्रा, यात्रा यांमुळे तमाशाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, कोरोना रुग्ण वाढू लागल्याने ऐन हंगामातच तमाशा व्यावसायावर संकट कोसळले आहे.

(फोटो - कोंडीराम आवळे)

संपूर्ण आयुष्य तमाशासाठी दिले आहे. ७४व्या वर्षी कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. वगनाट्य लिहिणारा मी कलाकार या संकटाच्या काळात उदरनिर्वाह कसा करू, असा प्रश्न आहे.

- कोंडीराम आवळे, तमाशा कलावंत

(फोटो - रघुवीर खेडकर)

सरकारला मदतीचे आवाहन करूनही काहीही उपयोग झाला नाही. आमच्या फडात १३० कलावंत आहेत. कोरोनामुळे एका वर्षात मोठ्या फडाचे दोन ते अडीच कोटी आणि लहान फडाचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या कलाकार पडेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहेत.

- रघुवीर खेडकर, तमाशा कलावंत

------------------------------------