शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

काळ आला होता पण डॉक्टरांनी वेळ थांबवली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST

खोडद : विषारी सर्पाने दंश केल्यानंतर काही वेळातच ती महिला पूर्णपणे बेशुद्ध झाली. श्वासोच्छ्वास, रक्तदाब व हृदयाचे ठोके पूर्णपणे ...

खोडद : विषारी सर्पाने दंश केल्यानंतर काही वेळातच ती महिला पूर्णपणे बेशुद्ध झाली. श्वासोच्छ्वास, रक्तदाब व हृदयाचे ठोके पूर्णपणे बंद पडले. या महिलेला अत्यंत विषारी अशा नागाने दंश केल्याने व तिची झालेली अवस्था पाहून तिच्या जगण्याची आशा सोडली होती. केवळ प्रयत्न म्हणून त्या महिलेला मृत झाली असे समजून नारायणगाव येथील डॉ. राऊत यांच्या हॉस्पिटलमध्ये आणून एका बेडवर टाकली. आता फक्त डॉक्टर तिला तपासतील आणि तिला मृत घोषित करतील, असा विचार करत नातेवाईक हॉस्पिटलच्या बाहेर थांबले होते. पण डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांनी शर्थीचे प्रयत्न करून या महिलेचा जीव वाचविण्यात यश मिळविले.

मृत झाली असे समजून तिच्या जगण्याची आशा सोडलेल्या नातेवाईकांनी डॉ. राऊत यांच्या रूपाने देवदूत भेटल्याची भावना व्यक्त केली. काळ आला होता पण डॉ. राऊत यांनी आपल्या अथक प्रयत्नानंतर या महिलेच्या मृत्यूची वेळ थांबवली होती, जणू याचीच प्रचिती या महिलेच्या नातेवाईकांना आली.

याबाबत माहिती अशी की, अलकाबाई पांडुरंग भोर (वय ६५, रा. आभाळवाडी, अकलापूर, ता. संगमनेर) ही महिला गुरुवारी, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा. शेतातून घरी येत असताना तिच्या डाव्या पायाला विषारी सर्पाने तीव्र दंश केला. जवळ असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी धाव घेऊन दंश करणाऱ्या सर्पाला मारले. त्या सर्पाला मारल्यानंतर तो सात फुटी अत्यंत विषारी नाग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्पदंशानंतर महिलेची झालेली अवस्था पाहून ती मृत झाली असावी पण शेवटचा एक प्रयत्न म्हणून नातेवाईकांनी आभाळवाडी ते नारायणगाव हे ५० किलोमीटरचे अंतर अवघ्या ४० मिनिटांत पार करून या महिलेला त्वरित जीपमधून नारायणगाव येथे डॉ. राऊत यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर तिला मृत समजून नातेवाईकांनी अतिदक्षता विभागातील एका बेडवर या महिलेला टाकले. डॉ. राऊत व त्यांच्या टीमने प्राथमिक तपासण्या केल्या असता तिचा रक्तदाब लागत नव्हता. श्वासोच्छ्वास बंद होता, हृदयाचे ठोके लागत नव्हते.

डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांनी तत्काळ या महिलेला व्हेंटिलेटरवर कृत्रिम श्वासोच्छ्वास व इतर तातडीचे उपचार सुरू केले. महिलेच्या छातीवर मसाज दिला. सर्पदंशावरील लसीचे २० इंजेक्शन दिले. डॉ. राऊत दीड तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नाडीचे ठोके लागू लागले.

१२ तासानंतर डोळे उघडले, ३६ तासानंतर पूर्णपणे शुद्धीवर आली.

"आपल्या परिसरात कोणालाही सर्पदंश झाल्यास सदर रुग्णास जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. मंत्र-तंत्र करून विषबाधा उतरविण्याचा प्रयत्न करू नये. यात वेळ वाया जाऊन रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सर्पदंश झालेल्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी एक एक मिनिट हा लाख मोलाचा असतो."

- डॉ. सदानंद राऊत, नारायणगाव

सदस्य, जागतिक आरोग्य संघटना

सर्पदंश तज्ज्ञ समिती