शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

उजनी परिसरात टँकर मागविण्याची वेळ

By admin | Updated: April 10, 2017 02:10 IST

उजनी धरणासारखे मोठे धरण असूनही भिगवण आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी

भिगवण : उजनी धरणासारखे मोठे धरण असूनही भिगवण आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मागवावा लागण्याची वेळ आल्याने ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ म्हणीची आठवण नागरिकांना आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. याला ज्याप्रमाणे शासन जबाबदार आहे, त्याचप्रमाणे तालुक्याचे आजी-माजी लोकप्रतिनिधीही जबाबदार असल्याचे नागरिकांतून बोलले जाते.भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, विरवाडी, पोंधवडी गावाला प्रत्येक उन्हाळ्यात या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर कोणताही कायमस्वरूपी उपाय काढला जात नाही. २५ किलोमीटर अंतर असणाऱ्या बारामतीला भिगवणहून पाणीपुरवठा केला जात असताना, दोन-तीन किलोमीटर इतक्या कमी अंतरावरील गावांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येत आहे. पाणीपुरवठा योजना उन्हाळा आला की, कुचकामी ठरतात आणि नागरिकांना शासनाकडे मदत मागावी लागते. तक्रारवाडी हे गाव उजनी धरणाच्या कडेला वसले असून, या गावालादेखील उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कोणतीही पाणी योजना तयार करताना भविष्यातील नागरीकरण याचा विचार होत नाही. या योजनेतून मिळणाऱ्या हिस्सेदारीमुळे कायमस्वरूपी समस्या दूर होईल, अशा प्रकारे काम होताना दिसून येत नाही.प्रत्येक पावसाळ्यात पुढील वर्षी नक्की बांधू, असा संकल्प करण्यापेक्षा या तीनही गावांना पाणी कायमस्वरूपी मिळावे, असे वाटत असेल तर उजनी धरणात बुडीत बंधारा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. याविषयी शासन दरबारी तालुक्याचे लोकप्रतिनिधी तसेच लोकसहभागासाठी सामाजिक संस्था यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. याप्रकारे बुडीत बंधाऱ्याची संकल्पना दौंडचे माजी आमदार स्व.सुभाष कुल आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्यक्षात उतरवली असल्याचे उदाहरणही आहे. भिगवणसारख्या सातत्याने वाढ होत असलेल्या गावालाही पाणीपुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, यावर गावप्रतिनिधी यांच्याकडून कायम स्वरूपी उपाय केला जात नसल्याचे या दिवसात दिसून येत आहे. गावाचा विस्तार आणि वाढ होत असलेली नागरिकांची संख्या तसेच मिळणाऱ्या उत्पन्नातून असलेल्या योजना चालविताना ग्रामपंचायतीपुढे यक्ष प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहेत.मदनवाडी गावाला पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली असून, पदाधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत सामान्य नागरिकांना वेठीस धरत असून, या गावालाही पाणी कायमस्वरूपी मिळेल, अशी योजना राबविली जात नसल्याची स्थिती आहे.वडापुरीतील विहिरींची पाणीपातळी घटलीवडापुरी : सध्या दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. वडापुरी परिसरातील विहिरींची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे येणारे दोन ते तीन महिने कसे जातील, याचाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांंना उन्हाळ्यात विहिरींना पाणी चांगले राहील व उन्हाळा हंगामातील पिके चांगली येतील, असे वाटत होते. परंतु, पडत असलेल्या कडक उन्हामुळे विहिरींचे पाणी कमी झाले असल्याने उन्हाळ्यातील मका, भुईमूग इत्यादी पिके येतील का नाही, याचीच काळजी आत्तापासूनच सर्वांना वाटू लागली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली असून, आपापल्या शेतात पिकांना पाणी कमी पडू नये म्हणून पाण्यासाठी बोअर घेण्यास तालुक्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरू झाले असल्याचे पाहावयास मिळते. उन्हाळ्यातील दोन-तीन महिने कसे जातील, याचाच सध्या मोठा प्रश्न पुढील काही दिवसांत भेडसावणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे आहे.