शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

उजनी परिसरात टँकर मागविण्याची वेळ

By admin | Updated: April 10, 2017 02:10 IST

उजनी धरणासारखे मोठे धरण असूनही भिगवण आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी

भिगवण : उजनी धरणासारखे मोठे धरण असूनही भिगवण आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मागवावा लागण्याची वेळ आल्याने ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ म्हणीची आठवण नागरिकांना आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. याला ज्याप्रमाणे शासन जबाबदार आहे, त्याचप्रमाणे तालुक्याचे आजी-माजी लोकप्रतिनिधीही जबाबदार असल्याचे नागरिकांतून बोलले जाते.भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, विरवाडी, पोंधवडी गावाला प्रत्येक उन्हाळ्यात या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर कोणताही कायमस्वरूपी उपाय काढला जात नाही. २५ किलोमीटर अंतर असणाऱ्या बारामतीला भिगवणहून पाणीपुरवठा केला जात असताना, दोन-तीन किलोमीटर इतक्या कमी अंतरावरील गावांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येत आहे. पाणीपुरवठा योजना उन्हाळा आला की, कुचकामी ठरतात आणि नागरिकांना शासनाकडे मदत मागावी लागते. तक्रारवाडी हे गाव उजनी धरणाच्या कडेला वसले असून, या गावालादेखील उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कोणतीही पाणी योजना तयार करताना भविष्यातील नागरीकरण याचा विचार होत नाही. या योजनेतून मिळणाऱ्या हिस्सेदारीमुळे कायमस्वरूपी समस्या दूर होईल, अशा प्रकारे काम होताना दिसून येत नाही.प्रत्येक पावसाळ्यात पुढील वर्षी नक्की बांधू, असा संकल्प करण्यापेक्षा या तीनही गावांना पाणी कायमस्वरूपी मिळावे, असे वाटत असेल तर उजनी धरणात बुडीत बंधारा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. याविषयी शासन दरबारी तालुक्याचे लोकप्रतिनिधी तसेच लोकसहभागासाठी सामाजिक संस्था यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. याप्रकारे बुडीत बंधाऱ्याची संकल्पना दौंडचे माजी आमदार स्व.सुभाष कुल आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्यक्षात उतरवली असल्याचे उदाहरणही आहे. भिगवणसारख्या सातत्याने वाढ होत असलेल्या गावालाही पाणीपुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, यावर गावप्रतिनिधी यांच्याकडून कायम स्वरूपी उपाय केला जात नसल्याचे या दिवसात दिसून येत आहे. गावाचा विस्तार आणि वाढ होत असलेली नागरिकांची संख्या तसेच मिळणाऱ्या उत्पन्नातून असलेल्या योजना चालविताना ग्रामपंचायतीपुढे यक्ष प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहेत.मदनवाडी गावाला पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली असून, पदाधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत सामान्य नागरिकांना वेठीस धरत असून, या गावालाही पाणी कायमस्वरूपी मिळेल, अशी योजना राबविली जात नसल्याची स्थिती आहे.वडापुरीतील विहिरींची पाणीपातळी घटलीवडापुरी : सध्या दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. वडापुरी परिसरातील विहिरींची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे येणारे दोन ते तीन महिने कसे जातील, याचाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांंना उन्हाळ्यात विहिरींना पाणी चांगले राहील व उन्हाळा हंगामातील पिके चांगली येतील, असे वाटत होते. परंतु, पडत असलेल्या कडक उन्हामुळे विहिरींचे पाणी कमी झाले असल्याने उन्हाळ्यातील मका, भुईमूग इत्यादी पिके येतील का नाही, याचीच काळजी आत्तापासूनच सर्वांना वाटू लागली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली असून, आपापल्या शेतात पिकांना पाणी कमी पडू नये म्हणून पाण्यासाठी बोअर घेण्यास तालुक्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरू झाले असल्याचे पाहावयास मिळते. उन्हाळ्यातील दोन-तीन महिने कसे जातील, याचाच सध्या मोठा प्रश्न पुढील काही दिवसांत भेडसावणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे आहे.