शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

उजनी परिसरात टँकर मागविण्याची वेळ

By admin | Updated: April 10, 2017 02:10 IST

उजनी धरणासारखे मोठे धरण असूनही भिगवण आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी

भिगवण : उजनी धरणासारखे मोठे धरण असूनही भिगवण आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मागवावा लागण्याची वेळ आल्याने ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ म्हणीची आठवण नागरिकांना आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. याला ज्याप्रमाणे शासन जबाबदार आहे, त्याचप्रमाणे तालुक्याचे आजी-माजी लोकप्रतिनिधीही जबाबदार असल्याचे नागरिकांतून बोलले जाते.भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, विरवाडी, पोंधवडी गावाला प्रत्येक उन्हाळ्यात या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर कोणताही कायमस्वरूपी उपाय काढला जात नाही. २५ किलोमीटर अंतर असणाऱ्या बारामतीला भिगवणहून पाणीपुरवठा केला जात असताना, दोन-तीन किलोमीटर इतक्या कमी अंतरावरील गावांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येत आहे. पाणीपुरवठा योजना उन्हाळा आला की, कुचकामी ठरतात आणि नागरिकांना शासनाकडे मदत मागावी लागते. तक्रारवाडी हे गाव उजनी धरणाच्या कडेला वसले असून, या गावालादेखील उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कोणतीही पाणी योजना तयार करताना भविष्यातील नागरीकरण याचा विचार होत नाही. या योजनेतून मिळणाऱ्या हिस्सेदारीमुळे कायमस्वरूपी समस्या दूर होईल, अशा प्रकारे काम होताना दिसून येत नाही.प्रत्येक पावसाळ्यात पुढील वर्षी नक्की बांधू, असा संकल्प करण्यापेक्षा या तीनही गावांना पाणी कायमस्वरूपी मिळावे, असे वाटत असेल तर उजनी धरणात बुडीत बंधारा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. याविषयी शासन दरबारी तालुक्याचे लोकप्रतिनिधी तसेच लोकसहभागासाठी सामाजिक संस्था यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. याप्रकारे बुडीत बंधाऱ्याची संकल्पना दौंडचे माजी आमदार स्व.सुभाष कुल आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्यक्षात उतरवली असल्याचे उदाहरणही आहे. भिगवणसारख्या सातत्याने वाढ होत असलेल्या गावालाही पाणीपुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, यावर गावप्रतिनिधी यांच्याकडून कायम स्वरूपी उपाय केला जात नसल्याचे या दिवसात दिसून येत आहे. गावाचा विस्तार आणि वाढ होत असलेली नागरिकांची संख्या तसेच मिळणाऱ्या उत्पन्नातून असलेल्या योजना चालविताना ग्रामपंचायतीपुढे यक्ष प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहेत.मदनवाडी गावाला पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली असून, पदाधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत सामान्य नागरिकांना वेठीस धरत असून, या गावालाही पाणी कायमस्वरूपी मिळेल, अशी योजना राबविली जात नसल्याची स्थिती आहे.वडापुरीतील विहिरींची पाणीपातळी घटलीवडापुरी : सध्या दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. वडापुरी परिसरातील विहिरींची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे येणारे दोन ते तीन महिने कसे जातील, याचाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांंना उन्हाळ्यात विहिरींना पाणी चांगले राहील व उन्हाळा हंगामातील पिके चांगली येतील, असे वाटत होते. परंतु, पडत असलेल्या कडक उन्हामुळे विहिरींचे पाणी कमी झाले असल्याने उन्हाळ्यातील मका, भुईमूग इत्यादी पिके येतील का नाही, याचीच काळजी आत्तापासूनच सर्वांना वाटू लागली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली असून, आपापल्या शेतात पिकांना पाणी कमी पडू नये म्हणून पाण्यासाठी बोअर घेण्यास तालुक्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरू झाले असल्याचे पाहावयास मिळते. उन्हाळ्यातील दोन-तीन महिने कसे जातील, याचाच सध्या मोठा प्रश्न पुढील काही दिवसांत भेडसावणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे आहे.