शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

पाणीटंचाईने आणली उघड्यावर राहण्याची वेळ

By admin | Updated: April 19, 2016 01:05 IST

नदीच्या कडेला गाव असून, पाणी नाही. घर बांधण्यासाठी ठेवलेले पैसे शेतीच्या पाण्यासाठी खर्च केले. बोअर घेतले, परंंतु तेही कोरडे गेले.

बारामती : नदीच्या कडेला गाव असून, पाणी नाही. घर बांधण्यासाठी ठेवलेले पैसे शेतीच्या पाण्यासाठी खर्च केले. बोअर घेतले, परंंतु तेही कोरडे गेले. ५५ हजारांची माती झाली. शेती तर जगलीच नाही. आता घर बांधण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे लेकराबाळांसह उघड्यावर राहण्याची वेळ आली, अशी हृदयद्रावक व्यथा निरवांगी (ता. इंदापूर) येथील वृद्धा कलावती गायकवाड यांनी मांडली. निरवांगी तसे पाहिले, तर नीरा नदीच्या कडेचे बागायती गाव. परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने गावाला उन्हाळ्यात कायमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नदीपात्रातील बेसुमार वाळूउपशामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही खोलवर गेली आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधार्थ येथील शेतकरी खिसा रिकामा करीत आहेत. कलावती नामदेव गायकवाड आणि उत्तमराव गायकवाड ही माय-लेकराची जोडी शेती, जनावरे जगवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. नीरा नदीपासून काही अंतरावरच उत्तमराव गायकवाड यांची तीन एकर जमीन आहे; मात्र तिही आता उजाड झाली आहे. शेतात नावालाही पीक नाही. त्यांच्या दावणीला सहा ते सात जनावरे आहेत. गावातही आजूबाजूला अशीच परिस्थिती असल्याने जनावरांना चारा, पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. जनावरे जगवण्यासाठी चाऱ्याची सोय करणे गरजेचे होते. दुष्काळामुळे चाऱ्याचे दरही गगणाला भिडले आहेत. मात्र खिशात दमडी नसल्याने चारा आणायचा कसा? असा त्यांच्यापुढे प्रश्न होता. उत्तमराव गायकवाड यांचे शेतातच झोपडे होते. उत्तमराव यांना तीन मुली व एक मुलगा, अशी अपत्ये आहेत. मुली मोठ्या होऊ लागल्याने त्यांनी पक्के घर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काडी-काडी जमवून ५५ हजार उभे केले. झोपडी मोडून त्याजागी घराचे काम सुरू केले. मात्र, दुष्काळाने उत्तमरावांना पुरते हतबल केले. दावणीची जनावरे अन्न-पाण्यावाचून तडफडू लागली. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न उत्तमरावांनी केला. आई कलावती यांच्या सल्ल्याने बोअर घेण्याचा निर्णय घेतला. नदी अगदी जवळ असल्याने बोअरला चांगले पाणी लागेल, असा त्यांचा अंदाज होता, त्यामुळे घराच्या बांधकामासाठी ठेवलेले ५५ हजार रुपये त्यांनी बोअरसाठी खर्च केले. मात्र, उत्तमरावांचा हा अंदाज पुरता खोटा ठरला. बोअर कोरडे गेले. दिवस-रात्र प्रतीक्षा केल्यानंतर केवळ अर्धा ते पाऊनतास बोअर चालते. मात्र, बोअरचे पाणीही क्षारयुक्त असल्याने जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्याच पाण्यावर जनावरांची व घरच्या माणसांची तहान भागवली जात आहे. या अत्यल्प पाण्यावर त्यांनी जनावरांसाठी काही प्रमाणात चाराही लावला आहे. मात्र, या क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनीही क्षारपड झाल्या आहेत.