शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईने आणली उघड्यावर राहण्याची वेळ

By admin | Updated: April 19, 2016 01:05 IST

नदीच्या कडेला गाव असून, पाणी नाही. घर बांधण्यासाठी ठेवलेले पैसे शेतीच्या पाण्यासाठी खर्च केले. बोअर घेतले, परंंतु तेही कोरडे गेले.

बारामती : नदीच्या कडेला गाव असून, पाणी नाही. घर बांधण्यासाठी ठेवलेले पैसे शेतीच्या पाण्यासाठी खर्च केले. बोअर घेतले, परंंतु तेही कोरडे गेले. ५५ हजारांची माती झाली. शेती तर जगलीच नाही. आता घर बांधण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे लेकराबाळांसह उघड्यावर राहण्याची वेळ आली, अशी हृदयद्रावक व्यथा निरवांगी (ता. इंदापूर) येथील वृद्धा कलावती गायकवाड यांनी मांडली. निरवांगी तसे पाहिले, तर नीरा नदीच्या कडेचे बागायती गाव. परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने गावाला उन्हाळ्यात कायमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नदीपात्रातील बेसुमार वाळूउपशामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही खोलवर गेली आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधार्थ येथील शेतकरी खिसा रिकामा करीत आहेत. कलावती नामदेव गायकवाड आणि उत्तमराव गायकवाड ही माय-लेकराची जोडी शेती, जनावरे जगवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. नीरा नदीपासून काही अंतरावरच उत्तमराव गायकवाड यांची तीन एकर जमीन आहे; मात्र तिही आता उजाड झाली आहे. शेतात नावालाही पीक नाही. त्यांच्या दावणीला सहा ते सात जनावरे आहेत. गावातही आजूबाजूला अशीच परिस्थिती असल्याने जनावरांना चारा, पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. जनावरे जगवण्यासाठी चाऱ्याची सोय करणे गरजेचे होते. दुष्काळामुळे चाऱ्याचे दरही गगणाला भिडले आहेत. मात्र खिशात दमडी नसल्याने चारा आणायचा कसा? असा त्यांच्यापुढे प्रश्न होता. उत्तमराव गायकवाड यांचे शेतातच झोपडे होते. उत्तमराव यांना तीन मुली व एक मुलगा, अशी अपत्ये आहेत. मुली मोठ्या होऊ लागल्याने त्यांनी पक्के घर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काडी-काडी जमवून ५५ हजार उभे केले. झोपडी मोडून त्याजागी घराचे काम सुरू केले. मात्र, दुष्काळाने उत्तमरावांना पुरते हतबल केले. दावणीची जनावरे अन्न-पाण्यावाचून तडफडू लागली. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न उत्तमरावांनी केला. आई कलावती यांच्या सल्ल्याने बोअर घेण्याचा निर्णय घेतला. नदी अगदी जवळ असल्याने बोअरला चांगले पाणी लागेल, असा त्यांचा अंदाज होता, त्यामुळे घराच्या बांधकामासाठी ठेवलेले ५५ हजार रुपये त्यांनी बोअरसाठी खर्च केले. मात्र, उत्तमरावांचा हा अंदाज पुरता खोटा ठरला. बोअर कोरडे गेले. दिवस-रात्र प्रतीक्षा केल्यानंतर केवळ अर्धा ते पाऊनतास बोअर चालते. मात्र, बोअरचे पाणीही क्षारयुक्त असल्याने जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्याच पाण्यावर जनावरांची व घरच्या माणसांची तहान भागवली जात आहे. या अत्यल्प पाण्यावर त्यांनी जनावरांसाठी काही प्रमाणात चाराही लावला आहे. मात्र, या क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनीही क्षारपड झाल्या आहेत.