शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

पाणीटंचाईने आणली उघड्यावर राहण्याची वेळ

By admin | Updated: April 19, 2016 01:05 IST

नदीच्या कडेला गाव असून, पाणी नाही. घर बांधण्यासाठी ठेवलेले पैसे शेतीच्या पाण्यासाठी खर्च केले. बोअर घेतले, परंंतु तेही कोरडे गेले.

बारामती : नदीच्या कडेला गाव असून, पाणी नाही. घर बांधण्यासाठी ठेवलेले पैसे शेतीच्या पाण्यासाठी खर्च केले. बोअर घेतले, परंंतु तेही कोरडे गेले. ५५ हजारांची माती झाली. शेती तर जगलीच नाही. आता घर बांधण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे लेकराबाळांसह उघड्यावर राहण्याची वेळ आली, अशी हृदयद्रावक व्यथा निरवांगी (ता. इंदापूर) येथील वृद्धा कलावती गायकवाड यांनी मांडली. निरवांगी तसे पाहिले, तर नीरा नदीच्या कडेचे बागायती गाव. परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने गावाला उन्हाळ्यात कायमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नदीपात्रातील बेसुमार वाळूउपशामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही खोलवर गेली आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधार्थ येथील शेतकरी खिसा रिकामा करीत आहेत. कलावती नामदेव गायकवाड आणि उत्तमराव गायकवाड ही माय-लेकराची जोडी शेती, जनावरे जगवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. नीरा नदीपासून काही अंतरावरच उत्तमराव गायकवाड यांची तीन एकर जमीन आहे; मात्र तिही आता उजाड झाली आहे. शेतात नावालाही पीक नाही. त्यांच्या दावणीला सहा ते सात जनावरे आहेत. गावातही आजूबाजूला अशीच परिस्थिती असल्याने जनावरांना चारा, पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. जनावरे जगवण्यासाठी चाऱ्याची सोय करणे गरजेचे होते. दुष्काळामुळे चाऱ्याचे दरही गगणाला भिडले आहेत. मात्र खिशात दमडी नसल्याने चारा आणायचा कसा? असा त्यांच्यापुढे प्रश्न होता. उत्तमराव गायकवाड यांचे शेतातच झोपडे होते. उत्तमराव यांना तीन मुली व एक मुलगा, अशी अपत्ये आहेत. मुली मोठ्या होऊ लागल्याने त्यांनी पक्के घर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काडी-काडी जमवून ५५ हजार उभे केले. झोपडी मोडून त्याजागी घराचे काम सुरू केले. मात्र, दुष्काळाने उत्तमरावांना पुरते हतबल केले. दावणीची जनावरे अन्न-पाण्यावाचून तडफडू लागली. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न उत्तमरावांनी केला. आई कलावती यांच्या सल्ल्याने बोअर घेण्याचा निर्णय घेतला. नदी अगदी जवळ असल्याने बोअरला चांगले पाणी लागेल, असा त्यांचा अंदाज होता, त्यामुळे घराच्या बांधकामासाठी ठेवलेले ५५ हजार रुपये त्यांनी बोअरसाठी खर्च केले. मात्र, उत्तमरावांचा हा अंदाज पुरता खोटा ठरला. बोअर कोरडे गेले. दिवस-रात्र प्रतीक्षा केल्यानंतर केवळ अर्धा ते पाऊनतास बोअर चालते. मात्र, बोअरचे पाणीही क्षारयुक्त असल्याने जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्याच पाण्यावर जनावरांची व घरच्या माणसांची तहान भागवली जात आहे. या अत्यल्प पाण्यावर त्यांनी जनावरांसाठी काही प्रमाणात चाराही लावला आहे. मात्र, या क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनीही क्षारपड झाल्या आहेत.