शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ

By admin | Updated: April 5, 2016 01:04 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांकडून परीक्षा अर्ज जमा करून घेण्याबाबत ताठर भूमिका घेतली जात असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांकडून परीक्षा अर्ज जमा करून घेण्याबाबत ताठर भूमिका घेतली जात असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. परीक्षेला बसू देण्याबाबत विद्यापीठाची कोणतीही हरकत नसताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून मात्र विद्यार्थ्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात असल्याचे समोर आले आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे आॅनलाईन अर्ज भरण्याबाबत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरणे अपेक्षित आहे.मात्र, आर्थिक व कौटुंबिक कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेला नाही. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न करता परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठात पाठविले जाते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून परीक्षा विभागात विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. वाडिया महाविद्यालयातील बीबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी व सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांची भेट घेऊन याबाबत विनंती केली. मात्र, महाविद्यालयाकडूनच नकार येत असल्याने परीक्षा नियंत्रक हतबल आहेत.विद्यापीठाने प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाकडे सोपविली आहे. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्याचा परीक्षा अर्ज नाकारावा आणि कोणत्या विद्यार्थ्याचा स्वीकारावा हे सर्वस्वी प्राचार्यांच्या हातात आहे. काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ ते २0 दिवसांनी सुरू होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र, विद्यापीठाने लेखी पत्र दिले तरच विद्यार्थ्यांचा अर्ज भरून घेतला जाईल, असे वाडिया कॉलेजच्या प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.