शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

तुकोबांच्या पादुकांना यंदाही टँकरच्या पाण्याने स्नान?

By admin | Updated: July 6, 2016 03:14 IST

दुष्काळामुळे मागील तीन वर्षांपासून नीरा नदी खळाळलीच नाही. त्यामुळे तुकोबांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने स्नान घालावे लागले

बावडा : पांडुरंगा औंदा तरी नीरेला पाणी येऊ दे!,तुकोबाच्या पादुकांना वाहत्या गंगेत न्हाऊ दे!असे साकडे बावडा व सराटी परिसरातील भाविकांनी विठ्ठलाला घातले आहे. दुष्काळामुळे मागील तीन वर्षांपासून नीरा नदी खळाळलीच नाही. त्यामुळे तुकोबांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने स्नान घालावे लागले. यंदा पावसाला चांगली सुरुवात झाली; मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे निरेला पाणी नाही. पालखी सराटीत येण्यासाठी काही दिवस उरले आहेत. सध्या नीरा नदी कोरडी आहे. बंधाराही पूर्ण कोरडा पडला आहे. अशा अवस्थेत वारकऱ्यांची कशी सोय होणार, असा प्रश्न पुन्हा सराटीकरांना पडला आहे. संतश्रेष्ठ तुकोबारायांची पालखी ६ जुलैला इंदापूर तालुक्यात प्रवेश करणार असून, ९ जुलै रोजी इंदापूरचा मुक्काम आटोपून पालखी संध्याकाळी सराटी गावातील नीरेकाठी मुक्कामासाठी थांबणार आहे. पुणे जिल्ह्यातील हा शेवटचा मुक्काम असतो, त्यानंतर ही पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. पर्जन्यमान घटल्यामुळे तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मागील तीन वर्षे या नदीला पाणी येत नसल्याने कधी डोक्यावरून आणलेल्या हंड्याने, तर कधी टँकरने पादुकांना स्नान घालावे लागले. यंदा तरी नीरा नदीला पाणी यावे व पादुकांना वाहत्या पाण्यात स्नान मिळावे, यासाठी भाविक विठ्ठलाची आराधना करीत आहेत. तुकोबांच्या पालखीच्या स्वागताची ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. तहसीलदार वर्षा लांडगे यांनी नुकतीच शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वागताची तयारी करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. (वार्ताहर)इंदापूर बांधकाम उपविभागामार्फत इंदापूर ते सराटी या पालखी मार्गावर काटेरी झुडपे काढणे, साईडपट्ट्या भरणे, खड्डे बुजवणे इ. कामे हाती घेतली असल्याची माहिती सहायक अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांनी दिली.बावडा गावातही पालखी स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती सरपंच स्मिता पाटील, उपसरपंच अमोल घोगरे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.