शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

तुकोबा निघाले पंढरपुरा..!

By admin | Updated: June 17, 2017 00:44 IST

टाळ-मृदंगाचा निनाद, वीणेचा झंकार, ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा गजर आणि हाती भगव्या पताका घेतलेल्या हजारो वारकऱ्यांची उपस्थिती अशा अत्यंत भक्तीमय

- लोकमत न्यूज नेटवर्क

देहूगाव (पुणे) : टाळ-मृदंगाचा निनाद, वीणेचा झंकार, ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा गजर आणि हाती भगव्या पताका घेतलेल्या हजारो वारकऱ्यांची उपस्थिती अशा अत्यंत भक्तीमय वातावरणात जगद््गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी देहूतून पंढरीकडे प्रस्थान झाले. ‘‘संपदा सोहळा नावडे मनालाकरी ते टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी हे,तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनीत्याची चक्रपाणी वाट पाहे.’’सावळ्या विठूरायाच्या भेटीची आर्त आस मनी ठेवून हाती भगव्या पताका घेऊन लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीची वाट चालू लागला आहे. प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे साडेचारला शीळा मंदिरात सुनील मोरे व विठ्ठल मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संस्थानाचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे व अभिजित मोरे, जालिंदर मोरे व अशोक मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. ७ वाजता पालखीसोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधीची महापूजा, सकाळी १०ला संभाजी महाराज मोरे देहूकर यांनी कीर्तन केले. सकाळी ९च्या सुमारास म्हसलेकर मंडळी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका आणण्यासाठी म्हातारबुवा दिंडी व मानकरी गंगा म्हसलेकर हे भालचंद्र घोडेकर आणि कुटुंबीयांच्या वाड्यात दाखल झाले. येथे अभंग आरती झाल्यानंतर म्हसलेकरांनी या पादुका डोक्यावर घेऊन इनामदारवाड्यात आणल्या. येथे पादुकांची विधीवत पूजा दिलीपमहाराज मोरे गोसावी यांच्या हस्ते झाली. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर आणि इनामदारवाड्यातील पूजेनंतर पादुका पालखीचे मानकरी म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यांनी म्हतारबा दिंडीसह या पादुका भक्तीमय वातावरणात मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या.त्यानंतर दुपारी पावणेतीनला प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पादुकांची महापूजा करण्यात आली. आरतीनंतर सोहळ्यातील मानकरी, सेवेकरी, दिंडेकऱ्यांचा नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पादुका मोहक फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’ असा जयघोष झाला. तुतारी वाजली, टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दणाणला. त्यानंतर देहूतील तरुणांनी पालखी खांद्यावर घेतली आणि सायंकाळी साडेचारला वीणा मंडपातून पालखी बाहेर आली. या वेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. चोपदार नामदेव गिराम कानसुलकर, नारायण खैरे, देशमुख चोपदार व सेवेकरी तानाजी कळमकर, कांबळे यांच्यासह सर्व मानकऱ्यांना व सेवेकरी मंडळींना संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. आज सोहळा गावातील इनामदारवाड्यात मुक्कामास राहणार असून, शनिवारी सकाळी सोहळा आकुर्डीतील मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. पाऊस अजून समाधानकारक झालेला नाही त्यामुळे पेरणीची कामे अपूर्ण असल्याने वारीतील गर्दीवर काहीसा परिणाम जाणवत आहे. मात्र तरुण आणि महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. देहूनगरीतून हरित वारीवृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... पक्षीही सुस्वरें आळविती... या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर आजच्या काळात कृती करीत पर्यावरण रक्षणाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात ५० लाख वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार जय गणेश हरित वारीचा श्रीगणेशा देहूनगरीतून शुक्रवारी झाला. इंद्रायणीच्या तीरावर वृक्षारोपण करून वारकरी मंडळींनी ‘एकच लक्ष, देशी वृक्ष’ असा नारा दिला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरु ण मंडळातर्फे देहूमधील वैकुंठस्थान गोपाळपुरा येथे जय गणेश हरित वारीला प्रारंभ करण्यात आला. संत ज्ञानेवर महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थानश्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उद्या शनिवारी आळंदीतून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे. पहाटे ४पासून प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. यासाठी लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल झाले आहेत. सोहळ्याची वैशिष्ट्ये ...- सीसीटीव्हीची नजर- चोख पोलीस बंदोबस्त- सेवाभावी संस्थांतर्फे सेवा- वारकऱ्यांना सोहळा अनुभवता यावा यासाठी स्क्रीनची व्यवस्था- वाहतुकीत बदल- तरुण आणि महिलांचा सहभाग लक्षणीय- शेतीची कामे पूर्ण न झाल्यानेगर्दीवर परिणाम