शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

‘तिघाडी’मुळे एकहाती सत्तेसाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:11 IST

सत्तेच्या चाव्या कोणाकडे? : पुणेकरांचा कौल कोणाला? लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत, ...

सत्तेच्या चाव्या कोणाकडे? : पुणेकरांचा कौल कोणाला?

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत, तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे सर्वच राजकीय पक्षांची समीकरणे बदलली गेली आहेत. नवीन रचनेमुळे कोणत्याची एका पक्षाची महापालिकेत एकहाती सत्ता (स्पष्ट बहुमत) येईल, अशी शक्यता आता कमी झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चार सदस्यीय प्रभाग रचना व ‘मोदी फॅक्टर’ यामुळे सन २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, सन २००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना असताना, सन २००७ मध्ये एक सदस्यीय आणि सन २०१२ मध्ये दोन सदस्यीय प्रभाग रचना असताना भाजप सत्तेपासून दूरच राहिली होती. या तिन्ही निवडणुकांमध्ये कॉंग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेत आपले वर्चस्व राखले. ‘पुणे पॅॅटर्न’च्या निमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादीची आघाडीही अजित पवारांनी पुणे महापालिकेत अल्पकाळासाठी घडवून आणली.

या पार्श्वभूमीवर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस दोन सदस्यीय प्रभागासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात होते. या पक्षाचे कार्यकर्ते दोन सदस्यीय प्रभाग होणारच असे छातीठोकपणे सांगत होते. दुसरीकडे एक सदस्य प्रभाग पद्धत आल्यास काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची तयारी चालू केली होती. पाच वर्षांत भरपूर विकासकामे केली असल्याचे सांगत भाजपा प्रभाग कितीचाही होवो पुणेकर आमच्याच पाठीशी राहील, असे सांगत होती. मात्र, तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सर्वच पक्षांमध्ये चलबिचल आहे. प्रभाग कसे तयार होणार? यावर अनेकांची गणिते अवलंबून आहेत.

भाजपा आणि आरपीआय (आठवले गट) यांच्यात तुलनेने जागावाटपाची अडचण फार येणार नाही, असे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी राज्याच्या सत्तेतले वाटेकरी शिवसेना आणि कॉंग्रेस हे दोन पक्ष अडचण निर्माण करणारे आहेत. तिन्ही पक्षांची ताकद तर एकत्रित हवी पण जागावाटप कसे आणि त्याचा फायदा किती व तोटा किती? याबद्दल राष्ट्रवादी साशंक आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून कॉंग्रेसची शहरातली ताकद सातत्याने घसरत आली आहे. शिवसेनेचे अस्तित्व ठरावीक प्रभागापुरतेच आहे. त्यामुळे एकहाती सत्ता घेण्याचे आव्हान भाजपा आणि राष्ट्रवादी या शहरातल्या प्रमुख दोन पक्षांपुढे आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे भाजपमधील संभाव्य बंडखोरीला आळा बसण्याची शक्यता आहे.