शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

टिक् टिक् वाजते डोक्यात... धडधड वाढते ठोक्यात...!

By admin | Updated: March 4, 2015 00:32 IST

दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका मिळणार आहे, त्यामुळे आधी ती शांतपणे वाचून घे, कोणता प्रश्न कधी सोडवायचा त्याचे नियोजन कर, मग वेळेत प्रश्नपत्रिका सोडवं...,’’

पुणे: ‘‘दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका मिळणार आहे, त्यामुळे आधी ती शांतपणे वाचून घे, कोणता प्रश्न कधी सोडवायचा त्याचे नियोजन कर, मग वेळेत प्रश्नपत्रिका सोडवं...,’’ अशा सूचना देणारे पालक आणि बैठक क्रमांक शोधण्यासाठी परीक्षा केंद्रात धावाधाव करणारे विद्यार्थी. तर पहिला पेपर मराठीचा, चांगला सोडव अशा एकमेकांना शुभेच्छा देणारे मित्र, असे चित्र मंगळवारी शहरातील विविध शाळांसमोर दिसून आले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी दहावीची परीक्षा सुरू करण्यात आली. शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर सकाळी दहापासूनच पालकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक स्वत: विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आले होते. बोर्डाचा पहिलाच पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडी धाकधूूक होती. पालक विद्यार्थ्यांची समजूत काढून शांतपणे पेपर सोडव, मराठीचा पेपर आहे, घाबरू नकोस. प्रश्नपत्रिका मिळाली की ती पहिल्यांदा वाचून काढ, अकरा वाजल्याशिवाय उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात करू नकोस, असे सांगताना दिसत होते.परीक्षा केंद्राबाहेर पडल्यानंतर अनेक विद्यार्थी व पालक दुसरा पेपर कोणत्या परीक्षा केंद्रावर आहे, याची माहिती घेताना दिसत होते. तर कोणते कोणते प्रश्न सोडविले, असे विचारून काही पालक परीक्षा केंद्रावरच मुलांची शाळा घेत असल्याचेही चित्र दिसून आले. (प्रतिनिधी)४मुले परीक्षा केंद्रात गेल्यानंतर पालकांची अस्वस्थता वाढली होती. मात्र, परीक्षा देऊन आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून पालकांची अस्वस्थता कमी झाली. ‘‘ बाबा, पेपर सोप्पा गेला..., सर्व प्रश्न वेळेत सोडवले. चांगले मार्क पडतील’’ असे मुलांनी सांगताच पालक मोकळा श्वास घेत होते.४दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिल्यामुळे कोणता प्रश्न कधी सोडवावा, याचा निर्णय घेण्यास पुरेसा अवधी मिळाला. नियोजन करता आले. विचार करण्यास वेळ मिळाला. त्यामुळे सर्व पेपर वेळेत सोडवता आला, अशी प्रतिक्रिया परीक्षार्थी जयेश वाखरे व प्रतीक्षा डोंगरे यांनी व्यक्त केली.