शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

जुलैतील पावसाने भागविली तहान

By admin | Updated: August 8, 2016 01:14 IST

जुलै या एकाच महिन्यात झालेल्या संततधार पावसाने पवना धरण ८२ टक्के भरले आहे. त्यामुळे हे पाणी वर्षभर पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणार आहे

पिंपरी : जुलै या एकाच महिन्यात झालेल्या संततधार पावसाने पवना धरण ८२ टक्के भरले आहे. त्यामुळे हे पाणी वर्षभर पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणार आहे. आजअखेर ९२.५ टक्के पाणीसाठा झाला आहे. महापालिकेने पाणीकपात मागे घेतली असून, सोमवारपासून दिवसाआड पाणीकपात मागे घेतली आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा होणार आहे.पवना धरणाचा एकूण साठा २७२.११ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामध्ये २४०.९७ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठा ६५.३५ टक्के एवढा होता. सध्या २५ टक्के कपात पाणीपुरवठ्यात केली असून, आजच्या धरणसाठ्यानुसार हा पाणीपुरवठा २० एप्रिल २०१७पर्यंत पुरेल इतका आहे. १५ टक्के पाणीकपात केल्यास २२९ दिवस म्हणजे २० मार्च २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करता येईल. पाणीकपात १० टक्के केल्यास २१२ दिवस म्हणजे ३ मार्च २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करता येईल आणि कपात रद्द केली, तर १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होईल, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली होती. (प्रतिनिधी)