शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कळंबच्या सरपंचासह तीन सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:29 IST

शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याप्रकरणी पुणे विभागाचे अप्पर आयुक्त सुभाष डुंबरे यांनी कळंब ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच शोभा प्रदीप पाटील (गायकवाड) यांच्यासह तीन सदस्यांना अपात्र ठरविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याप्रकरणी पुणे विभागाचे अप्पर आयुक्त सुभाष डुंबरे यांनी कळंब ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच शोभा प्रदीप पाटील (गायकवाड) यांच्यासह तीन सदस्यांना अपात्र ठरविले आहे.अप्पर आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाबाबत सामाजिक कार्यकर्ते मनोहर घोडके व गोरख खंडागळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.कळंब हे इंदापूर तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव. सरपंचांसह विद्यमान सदस्य महादेव रामचंद्र खरात, रोहिणी शिवाजी कोळी व लक्ष्मी सुनील मोरे यांना अपात्र ठरवले आहे.तसेच, राणी राजेंद्र पाटील यांनी अतिक्रमण केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध होत नसल्याने त्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून पात्र ठरत आहेत, अशी माहिती निकालाद्वारे अपिलार्थी यांना देण्यात आली आहे. पुणे येथील अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक १४१/२०१६ मध्ये १० जानेवारीला दिलेला आदेश रद्द करून वरील चार जणांना अपात्र ठरविले आहे.येथील घोडके व खंडागळे यांनी अतिक्रमण केल्याप्रकरणी आमरण उपोषण केले होते. पंचायत समितीच्या पदाधिकाºयांनी सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी जुजबी कारणे दाखवून संभ्रमित करणारा निकाल दिल्यानंतर, त्यांनी आयुक्तांकडे अपिलीय अर्ज दाखल केले. अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची खातेनिहाय चौकशीची मागणीबरोबर लवकर निकाल देण्यासाठी आत्मदहनाचा इशारा पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला. त्यानंतर दोन्ही बाजू जाणून घेऊन अप्पर आयुक्त सुभाष डुंबरे यांनी ही अपात्रतेची कारवाई केली.कळंब ग्रामपंचायतीच्या राजकारणात कायम अस्थिरता निर्माण होत असून विकासकामांना सतत खीळ बसत आहे. सध्या काँग्रेस पक्षाच्या प्रदीप पाटील यांच्या गटाचे, १० तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे ७ सदस्य आहेत.अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करायावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सामाजिक कार्यकर्ते खंडागळे यांनी सांगितले की, विद्यमान सरपंच व इतर सदस्यांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करून पदाचा गैरवापर केला आहे. यापूर्वी देखील माजी सभापती प्रदीप पाटील सरपंच पदावर असताना, त्यांनी घरकुलप्रकरणी पदाचा गैरवापर करीत अक्षरश: जाती बदलून लाभ घेतल्यामुळे त्यांचे निलंबन झाले होते. आतादेखील शासकीय जागेमध्ये अतिक्रमण झालेले असताना अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी यापूर्वीचा निकाल जुजबी कारणे दाखवून संभ्रमित करणारा दिला. त्यामुळे काही दिवसांत अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांनी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी निलंबनाची मागणी करणार आहे. यावेळी प्रसंगी आमरण उपोषण करणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.