शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तिघे ठार

By admin | Updated: October 7, 2015 04:03 IST

केडगाव ता. (दौंड) येथे चौफुला रस्त्यावर अशोक लेलँड व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तीघेजण ठार झाले. या घटनेनंतर संतप्त जमावाने सदरचा ट्रक

केडगाव : केडगाव ता. (दौंड) येथे चौफुला रस्त्यावर अशोक लेलँड व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तीघेजण ठार झाले. या घटनेनंतर संतप्त जमावाने सदरचा ट्रक पेटवून दिला. ही घटना आज मंगळवारी (दिनांक ६) रात्री साडे आठच्या दरम्यान घडली.या घटनेत बोरीपार्धी येथील संतोष विष्णू नेवसे (वय ३४), सुभाष अर्जुन नेवसे (वय ४२), हे जागीच ठार झाले. तर श्रीरंग मारुती नेवसे (वय ४४) हे दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तिघेही युवक विवाहीत होते. हे तिघेजण केडगाववरून चौफुल्याकडे आपल्या दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने ट्रकने त्यांना धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की, तिघेजण रस्त्यावरून दूर फेकले गेले. दुचाकीचीही दुरवस्था झाली होती. मयतांच्या डोक्याला व पोटाला गंभीर मार लागला होता. घटनेनंतर परिसरातील जमाव तेथे जमा झाला. त्यांनी ट्रक रॉकेलच्या साह्याने पेटवून दिला. सुमारे पाऊण तासानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. केडगाव चौफुला रस्त्यावर असणाऱ्या अरुंद पुलाशेजारी ही घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या दोन वषार्तील या पुलाजवळील ही तिसरी घटना आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. तिघांना शवविच्छेदनासाठी यवत येथे नेले होते. केडगाव चौफुला रस्त्यावर अरुंद पुलावर यापूर्वी अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे शिरुर- सातारा या राज्यमार्गावर हा रस्ता असुनही ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य आहे. यामुळेच सदरचा अपघात घडला असावा असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला.