शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

कुरकुंभ एमआयडीसीतील तीन कंपन्या केल्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या विषारी व दूषित पाण्याच्या कारणावरून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या विषारी व दूषित पाण्याच्या कारणावरून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अखेर कारवाईचा बडगा उचला. शनिवारी तब्बल तीन कंपन्या बंद करत १५ कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने बजावल्या आहेत. महात्मे डायकेम, यू. के. इंटरमेडिऐट आणि अर्थकेम लॅबोरेटरी या कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. उशिरा का होईना पण प्रशासनाला अखेर जाग आली आहे.

कुरकुंभ ौद्योगिक वसाहतीत येथील कंपन्यांमार्फत प्रदूषण केले जात होते. याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. शुक्रवारी तर काही अज्ञातांनी चाऱ्या फोडल्याने दूषित पाणी शेतात गेल्याने माठे नुकसान झाले होते. यामुळे येथून येणाऱ्या वारंवार तक्रारींची दखल अखरे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला घ्यावी लागली. मंडळाच्या पथकाने शनिवारी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राची पाहणी करून दोषी असणाऱ्या वरील तीन कंपन्या त्वरित बंद करण्याचे आदेश देत त्यांचे वीज व पाणी बंद केले. तर सुयश ऑरगॅनिक्स, भूशिल्पा केमिकल, सिद्धी विनायक केमिकल्स, रॉयल एम्ब्रॉयडरी, चार्म्स केमिकल्स, एक्सप्लिसीट केमिकल्स, कुलकर्णी ऑरगॅनिक्स यांना प्रस्तावित सूचना दिल्या आहेत. तर विनामॅक्स ऑरगॅनिक्स, रेणुका, जे. पी. लॅबोरेटरी, विश्वा लॅब, रामकमल केमिकल्स यांना प्रकल्प बंद का करू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली. हार्मोनी ऑरगॅनिक्सची प्रदूषण मंडळाकडे असणारी अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्यात आली आहे. तसेच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

चौकट

‘लोकमत’च्या वृत्तांची दखल

शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात येणाऱ्या रासायनिक विषारी व दूषित पाणी अडवण्याची घेतलेल्या तटस्थ भूमिकेने थेट पुणे-सोलापूर महामार्गावरच सर्व पाणी जमा झाले होते. परिणामी, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त दिले होते. यामुळे प्रशासनाला याची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. याचा आधार घेत प्रदूषण मंडळाने ही कारवाई केली आहे. कुरकुंभ येथे रासायनिक प्रकल्पावर झालेल्या कारवाईमुळे येणाऱ्या काळात प्रदूषणाच्या समस्येवर काही प्रमाणात लगाम लागण्याची चिन्हे आहेत. मात्र, या कारवाईने प्रदूषण मंडळाचा अंकुश किती दिवस टिकणार, हे पाहणे गरजेचे आहे.

चौकट

रहस्यमय कारवाई

पुणे-सोलापूर महामार्गावरील चारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास फोडून रासायनिक विषारी व दूषित पाणी शेतात व कुरकुंभच्या ओढ्यात सोडून देण्यात आले. मात्र, ही कारवाई कोणी केली याबाबतचे रहस्य उलगडत नाही. तहसीलदार संजय पाटील यांनी ही कारवाई रस्ते प्रशासनाने केली असल्याचे सांगितले. मात्र, रस्ते प्रशासनाने तो मी नव्हेच ही भूमिका घेतल्याने कारवाई कोणी केली? याबाबत कुरकुंभ येथे चर्चेला उधाण आले आहे.