शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

गोडबोले कुटुंबातील तिघा भावांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST

पुणे : शहरात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य कोरोनामुळे दगावत असल्याचे सुन्न करणारे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच एक मन ...

पुणे : शहरात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य कोरोनामुळे दगावत असल्याचे सुन्न करणारे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जुन्या व प्रथितयश गोडबोले कुटुंबातील विश्वनाथ, अरविंद आणि डॉ. रमेश गोडबोले या तिघा भावांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ही गोष्ट पुणेकरांच्या मनाला चटका लावून गेली आहे. खरंतर वडील नीलकंठ बापू गोडबोले सराफ यांनी वयाची शंभर वर्षे पार करून निरोगी दीर्घायुष्याचा आदर्श समाजापुढे ठेवला होता. मात्र, मुलांना दीर्घायुष्य लाभू शकले नाही याविषयी हळहळ व्यक्त करण्यात आली.

विश्वनाथ ऊर्फ दादा गोडबोले (वय ९०) यांचा वडिलोपार्जित सोने-चांदी सराफीचा व्यवसाय. हिरे आणि नवरत्न हे त्यांचे अभ्यासाचे विषय राहिले. मध्यमवर्गीयांसाठी कमी वजनात हिऱ्याचे व नवरत्नांचे दागिने कसे बनतील यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. रुग्णोपयोगी साहित्य त्यांनी अल्प भाड्यात उपलब्ध करून दिले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा सर्जन रघुनाथ गोडबोले, मुलगी विनया बापट, सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. नातू मिहिर सराफीचा व्यवसाय पुढे चालवत आहे.

अरविंद गोडबोले (वय ८६) यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी संपादन केली. जर्मन सरकारची शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षणासाठी दोन वर्षे जर्मनीला गेले. मातृभूमीच्या प्रेमाच्या ओढीने भारतात परतल्यावर त्यांनी ३२ वर्षे किर्लोस्कर कमिन्समध्ये नोकरी केली. जर्मन भाषेची पदविका पूर्ण करून त्यांनी तत्कालीन पुणे विद्याापीठात २० वर्षे जर्मन भाषेचे अध्यापन केले. भारत-चीन युद्धाच्या काळात १९६२ मध्ये त्यांनी साधेपणाने विवाह करून विवाहासाठी होणाऱ्या अपेक्षित खर्चाची सर्व रक्कम युद्ध सहाय्य समिती निधीमध्ये जमा केली होती. १९९६ मध्ये त्यांनी उत्सव सभागृह हे मंगल कार्यालय बांधले. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनीसाठी दर वर्षी त्यांनी पारितोषिक ठेवले आहे. त्यांच्यामागे विमा व गुंतवणूक सल्लागार अनिता आपटे ही मुलगी आणि सराफ व्यावसायिक सुजय हा मुलगा असा परिवार आहे.

डॉ. रमेश गोडबोले (वय ८०) हे डॉ. गोडबोले लॅबोरेटरीचे संचालक, डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेचे कार्यवाह होते. ‘मधुमित्र’ मासिकाचे ३० वर्षे संपादक होते. डॉ. गोडबोले ‘निसर्गसेवक’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष होते. स्मृतिवन आणि स्मृती उद्यान हे दोन वनीकरण प्रकल्प पूर्ण करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. त्यांनी ‘लढा साखरेशी’ आणि ‘मधुमेही गीता’ या पुस्तकांचे लेखन केले. मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार आणि वनमित्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

................................