शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

मेट्रोचे साडेतीन हजार कामगार गेले गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोनाच्या पुण्यातील वाढत्या प्रादुर्भावामुळे मेट्रोच्या कामावर असलेले साडेतीन हजार कामगार आपापल्या गावी निघून गेले. कामाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोनाच्या पुण्यातील वाढत्या प्रादुर्भावामुळे मेट्रोच्या कामावर असलेले साडेतीन हजार कामगार आपापल्या गावी निघून गेले. कामाच्या गतीवर त्याचा परिणाम झाला असून, प्राधान्य मार्ग विहित मुदतीत सुरू करणेही प्रशासनाला अडचणीचे होऊ लागले आहे.

मागील कोरोना टाळेबंदीत मेट्रोचे काम सलग तीन महिने बंद होते. त्याही वेळी कामगार असेच गावी निघून गेले होते. मेट्रोच्या कामावर असलेले बहुतांश कामगार उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमधील आहेत. होळीचा सण तिथे जोरात असतो. त्यासाठी ते गेले होते. त्यानंतर पुण्यात कोरोना स्थितीत वाढ झाली. त्यामुळे त्यांच्यातील अनेकजण परत आलेलेच नाहीत.

पुण्यात खाटा नाहीत,ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर नाहीत अशी स्थिती होऊ लागल्यावर इथे राहिलेले अनेक कामगार अचानक ग्रुप करून आपापल्या गावी निघून गेले. किमान साडेतीन हजारांनी कामगारांमध्ये घट झाली असल्याची माहिती मिळाली. ठेकेदारांकडे असलेले यातील बहुसंख्य कामगार मेट्रोच्या कामात कुशल आहेत. त्यामुळे ठेकेदार कंपनीची जास्त अडचण झाली आहे.

वनाज ते गरवारे महाविद्यालय तसेच पिंपरी-चिंचवड ते बोपोडी हे दोन मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. यातील पिंपरीकडचा मार्गाची चाचणी घेण्यात आली आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गाचे अंतिम काम सुरू आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या कामांची आता अडचण झाली आहे. पुरेशा संख्येने कामगार उपलब्ध होत नसल्याने कामाची गती कमी झाली आहे. ---//

कामगारांची संख्या कमी झाली आहे. होळीसाठी म्हणून गेलेले बरेचसे कामगार परत आलेले नाहीत व आता कोरोनाच्या भीतीने मोठ्या संख्येने कामगार गावी जाऊ लागले आहेत. कामाची गती यातून कमी होत आहे.

अतुल गाडगीळ- संचालक, प्रकल्प

-----//

कामगारांची आरोग्याची तसेच कोरोनापासून सुरक्षेची सर्व प्रकारची काळजी मेट्रो प्रशासनाकडून घेतली जात आहे. आता लस दिली जात आहेच, शिवाय ग्रुप करून त्यांना स्वतंत्रपणे लस देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

हेमंत सोनवणे- संचालक, जनसंपर्क

---//