शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

वीस गावांच्या नळपाणी योजना धोक्यात

By admin | Updated: February 5, 2016 02:19 IST

यावर्षी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. धरणातून मागील अडीच महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने गतवर्षीच्या तुलनेत

भोर : यावर्षी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. धरणातून मागील अडीच महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने गतवर्षीच्या तुलनेत दोन महिने आधीच धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे २० गावे व वाड्या-वस्त्यांच्या नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. पाणी खाली सोडण्याची परिस्थिती अशीच राहिल्यास, पुढील १५ दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती भाटघर धरण भागात निर्माण झाली आहे. भोर तालुक्यात या वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे भाटघर धरण ७० टक्केच भरले होते. शिवाय, भाटघर धरणातून मागील ३ महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा आता २१ टक्क्यावर आला आहे. दर वर्षी धरणातील पाणीसाठा मार्च महिन्याच्या अखेरीस कमी होतो. मात्र, यावेळी धरणातील पाणी लवकर खाली सोडल्याने व धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन महिने अगोदरच धरण रिकामे झाले आहे.यामुळे भाटघर धरणाचे पाणी मळेगावापर्यंत १५ किलोमीटर खाली आले असून, खांडवा पडत चालला आहे. धरणाच्या पात्रात असणाऱ्या खुलशी, गृहिणी, मळे, चांदवणे डेर, नानावळे, कुरुंजी कांबरे बु., कांबरे खुर्द रांजणवाडी, करंदी बु., करंदी खु., वाढाणे वाकांबे, गोरड म्हशीवली, आस्कवडी, तळे म्हशीवली, जोगवडी माझगाव या गावच्या विहिरीचे व नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे पाणी कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे खरेदी-विक्री संघाचे संचालक काळुराम मळेकर व कुरुंजीचे उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे यांनी सांगितले. (वार्ताहर)