शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीस गावांच्या नळपाणी योजना धोक्यात

By admin | Updated: February 5, 2016 02:19 IST

यावर्षी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. धरणातून मागील अडीच महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने गतवर्षीच्या तुलनेत

भोर : यावर्षी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. धरणातून मागील अडीच महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने गतवर्षीच्या तुलनेत दोन महिने आधीच धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे २० गावे व वाड्या-वस्त्यांच्या नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. पाणी खाली सोडण्याची परिस्थिती अशीच राहिल्यास, पुढील १५ दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती भाटघर धरण भागात निर्माण झाली आहे. भोर तालुक्यात या वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे भाटघर धरण ७० टक्केच भरले होते. शिवाय, भाटघर धरणातून मागील ३ महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा आता २१ टक्क्यावर आला आहे. दर वर्षी धरणातील पाणीसाठा मार्च महिन्याच्या अखेरीस कमी होतो. मात्र, यावेळी धरणातील पाणी लवकर खाली सोडल्याने व धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन महिने अगोदरच धरण रिकामे झाले आहे.यामुळे भाटघर धरणाचे पाणी मळेगावापर्यंत १५ किलोमीटर खाली आले असून, खांडवा पडत चालला आहे. धरणाच्या पात्रात असणाऱ्या खुलशी, गृहिणी, मळे, चांदवणे डेर, नानावळे, कुरुंजी कांबरे बु., कांबरे खुर्द रांजणवाडी, करंदी बु., करंदी खु., वाढाणे वाकांबे, गोरड म्हशीवली, आस्कवडी, तळे म्हशीवली, जोगवडी माझगाव या गावच्या विहिरीचे व नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे पाणी कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे खरेदी-विक्री संघाचे संचालक काळुराम मळेकर व कुरुंजीचे उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे यांनी सांगितले. (वार्ताहर)