शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

वीस गावांच्या नळपाणी योजना धोक्यात

By admin | Updated: February 5, 2016 02:19 IST

यावर्षी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. धरणातून मागील अडीच महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने गतवर्षीच्या तुलनेत

भोर : यावर्षी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. धरणातून मागील अडीच महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने गतवर्षीच्या तुलनेत दोन महिने आधीच धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे २० गावे व वाड्या-वस्त्यांच्या नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. पाणी खाली सोडण्याची परिस्थिती अशीच राहिल्यास, पुढील १५ दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती भाटघर धरण भागात निर्माण झाली आहे. भोर तालुक्यात या वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे भाटघर धरण ७० टक्केच भरले होते. शिवाय, भाटघर धरणातून मागील ३ महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा आता २१ टक्क्यावर आला आहे. दर वर्षी धरणातील पाणीसाठा मार्च महिन्याच्या अखेरीस कमी होतो. मात्र, यावेळी धरणातील पाणी लवकर खाली सोडल्याने व धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन महिने अगोदरच धरण रिकामे झाले आहे.यामुळे भाटघर धरणाचे पाणी मळेगावापर्यंत १५ किलोमीटर खाली आले असून, खांडवा पडत चालला आहे. धरणाच्या पात्रात असणाऱ्या खुलशी, गृहिणी, मळे, चांदवणे डेर, नानावळे, कुरुंजी कांबरे बु., कांबरे खुर्द रांजणवाडी, करंदी बु., करंदी खु., वाढाणे वाकांबे, गोरड म्हशीवली, आस्कवडी, तळे म्हशीवली, जोगवडी माझगाव या गावच्या विहिरीचे व नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे पाणी कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे खरेदी-विक्री संघाचे संचालक काळुराम मळेकर व कुरुंजीचे उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे यांनी सांगितले. (वार्ताहर)