शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

वनवैभव धोक्यात

By admin | Updated: March 28, 2016 03:24 IST

शहरीकरण वाढत असताना डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे भव्य इमारतींनी वने गिळकृंत केली

पिंपरी : शहरीकरण वाढत असताना डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे भव्य इमारतींनी वने गिळकृंत केली आहेत. मावळ, मुळशी आणि खेडमधील वनवैभव धोक्यात आले आहे. नैसर्गिक सौंदर्याचे आमिष दाखवून गृहप्रकल्प राबविणारे लोक डोंगर-दऱ्यांच्यालगत विविध प्रकारच्या सिटी विकसित करीत आहेत. नवीन पर्यटनस्थळ विकसित केली जात असल्यामुळे वनांचे सौंदर्य नष्ट होऊ लागले आहे. पिंपरी-चिंचवड या शहराच्या परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर वनवैभव होते. आता वृक्षांचे प्रमाण कमी झाले आहे. मावळ-मुळशीत वनवैभव दिसून येते. एकूण ३० हजार हेक्टर भाग वनाने व्यापलेला आहे. यातील काही भाग आंबेगाव व खेडचा आहे. मात्र, या भागात नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे वनविभागातील अतिक्रमण हटविण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे. झोपड्या हटविणे एक डोकेदुखी झली आहे. पोलिसी कुमक मागविण्याशिवाय वन विभागसमोर पर्याय नाही. वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावरवनसंपदेतील जैववैविध्य यामुळेच नष्ट होत गेले आहे. नवीन प्रजाती उत्पन्न होणे बंद झाले आहे. जंगलातील प्रजातींचे संवर्धन होणे ही एक मोठी जबाबदारी वन विभागावर आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक आहे. वनांतील त्रिफळा, बेहडा, हिरडा अशा आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा उपयोग केला जात आहे. आजही वटवाघूळ, साळविंदर यांची शिकार होत आहे. जंगलाच्या असुरक्षिततेत वाढ होत चालली आहे, हे यातून निदर्शनास आले आहे. जमिनीची धूप व पाण्याची गरज भागविण्याचे काम जंगल करीत आहेत. वनांच्या जनजागृतीची गरज आहे. (वार्ताहर)वृक्षारोपण कागदावरच : महापालिकेचे दुर्लक्षमाजी आयुक्त हरनामसिंग यांच्या कालावधीत शहरातील विविध भागांत ५५ हजार वृक्षांचे रोपण केले होते. त्यामुळे भोसरी भागात मोठे वृक्ष दिसून येत आहेत. १९८२ नंतर झाडांच्या प्रमाणात वाढ झालीच नाही. वृक्ष प्राधिकरण समिती, शहरातील विविध पर्यावरण समित्यांनी वृक्ष लागवडीसाठी कसोशीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. वनांची जनजागृती व विकास या दृष्टीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. हरनामसिंग यांच्या क ालावधीत वनांचा विकास झाला, त्यानंतर आजतागायत झाडे विकसित झाली नाहीत. त्या काळात कमी पावसावरही दीर्घायुषी झाडे लावली गेली व ती झाडे जगली आहेत.शहरी भागातील वनराई झाली लुप्तमहानगरपालिकेत प्रथम १४ गावे समाविष्ट झाली. विकासाच्या दृष्टीने गावांचा विकास होत गेला. मात्र, यामुळे जंगलाचे प्रमाणही तेवढेच कमी झाले व पर्जन्यवृष्टीचे प्रमाणही घटले. यामुळे ग्रामीण भागांवर शहर विकासाचे अतिक्रमण होणे, ही तितके च धोकादायक झाले आहे. शहरात रावेत, थेरगाव, भेगडेवाडी, वाल्हेकरवाडी, किवळे, चऱ्होली, तळवडे या भागात झाडांचे प्रमाण अधिक होते. आता फक्त दुर्गाटेकडीच्या भागातच वनवैभव दिसून येत आहे.मावळ-मुळशी भागात डोंगराळ जमीन जास्त आहे. या भागात वाहून जाणारी माती दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे. मात्र, नव्याने जास्त लागवड न होणारी जमीन उरलेली नाही. यासाठी जल व माती संवर्धन करणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियान व्यापक स्वरूपात राबविणे आवश्यक आहे. अतिक्रमणप्रवण क्षेत्रातही वाढ होत चालली आहे. यालाही आळा घालणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरण समित्यांनी व्यक्त केले आहे. शहराचा विकास झाला, तसा वनांचा विकास होत नाही. आज वनांवर स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. चोरट्या वृक्षतोडीवर वचक निर्माण झाला आहे. अवैध वृक्षतोड थांबली आहे. - सचिन डोंबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ