शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

वनवैभव धोक्यात

By admin | Updated: March 28, 2016 03:24 IST

शहरीकरण वाढत असताना डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे भव्य इमारतींनी वने गिळकृंत केली

पिंपरी : शहरीकरण वाढत असताना डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे भव्य इमारतींनी वने गिळकृंत केली आहेत. मावळ, मुळशी आणि खेडमधील वनवैभव धोक्यात आले आहे. नैसर्गिक सौंदर्याचे आमिष दाखवून गृहप्रकल्प राबविणारे लोक डोंगर-दऱ्यांच्यालगत विविध प्रकारच्या सिटी विकसित करीत आहेत. नवीन पर्यटनस्थळ विकसित केली जात असल्यामुळे वनांचे सौंदर्य नष्ट होऊ लागले आहे. पिंपरी-चिंचवड या शहराच्या परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर वनवैभव होते. आता वृक्षांचे प्रमाण कमी झाले आहे. मावळ-मुळशीत वनवैभव दिसून येते. एकूण ३० हजार हेक्टर भाग वनाने व्यापलेला आहे. यातील काही भाग आंबेगाव व खेडचा आहे. मात्र, या भागात नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे वनविभागातील अतिक्रमण हटविण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे. झोपड्या हटविणे एक डोकेदुखी झली आहे. पोलिसी कुमक मागविण्याशिवाय वन विभागसमोर पर्याय नाही. वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावरवनसंपदेतील जैववैविध्य यामुळेच नष्ट होत गेले आहे. नवीन प्रजाती उत्पन्न होणे बंद झाले आहे. जंगलातील प्रजातींचे संवर्धन होणे ही एक मोठी जबाबदारी वन विभागावर आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक आहे. वनांतील त्रिफळा, बेहडा, हिरडा अशा आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा उपयोग केला जात आहे. आजही वटवाघूळ, साळविंदर यांची शिकार होत आहे. जंगलाच्या असुरक्षिततेत वाढ होत चालली आहे, हे यातून निदर्शनास आले आहे. जमिनीची धूप व पाण्याची गरज भागविण्याचे काम जंगल करीत आहेत. वनांच्या जनजागृतीची गरज आहे. (वार्ताहर)वृक्षारोपण कागदावरच : महापालिकेचे दुर्लक्षमाजी आयुक्त हरनामसिंग यांच्या कालावधीत शहरातील विविध भागांत ५५ हजार वृक्षांचे रोपण केले होते. त्यामुळे भोसरी भागात मोठे वृक्ष दिसून येत आहेत. १९८२ नंतर झाडांच्या प्रमाणात वाढ झालीच नाही. वृक्ष प्राधिकरण समिती, शहरातील विविध पर्यावरण समित्यांनी वृक्ष लागवडीसाठी कसोशीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. वनांची जनजागृती व विकास या दृष्टीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. हरनामसिंग यांच्या क ालावधीत वनांचा विकास झाला, त्यानंतर आजतागायत झाडे विकसित झाली नाहीत. त्या काळात कमी पावसावरही दीर्घायुषी झाडे लावली गेली व ती झाडे जगली आहेत.शहरी भागातील वनराई झाली लुप्तमहानगरपालिकेत प्रथम १४ गावे समाविष्ट झाली. विकासाच्या दृष्टीने गावांचा विकास होत गेला. मात्र, यामुळे जंगलाचे प्रमाणही तेवढेच कमी झाले व पर्जन्यवृष्टीचे प्रमाणही घटले. यामुळे ग्रामीण भागांवर शहर विकासाचे अतिक्रमण होणे, ही तितके च धोकादायक झाले आहे. शहरात रावेत, थेरगाव, भेगडेवाडी, वाल्हेकरवाडी, किवळे, चऱ्होली, तळवडे या भागात झाडांचे प्रमाण अधिक होते. आता फक्त दुर्गाटेकडीच्या भागातच वनवैभव दिसून येत आहे.मावळ-मुळशी भागात डोंगराळ जमीन जास्त आहे. या भागात वाहून जाणारी माती दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे. मात्र, नव्याने जास्त लागवड न होणारी जमीन उरलेली नाही. यासाठी जल व माती संवर्धन करणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियान व्यापक स्वरूपात राबविणे आवश्यक आहे. अतिक्रमणप्रवण क्षेत्रातही वाढ होत चालली आहे. यालाही आळा घालणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरण समित्यांनी व्यक्त केले आहे. शहराचा विकास झाला, तसा वनांचा विकास होत नाही. आज वनांवर स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. चोरट्या वृक्षतोडीवर वचक निर्माण झाला आहे. अवैध वृक्षतोड थांबली आहे. - सचिन डोंबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ