शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वनवैभव धोक्यात

By admin | Updated: March 28, 2016 03:24 IST

शहरीकरण वाढत असताना डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे भव्य इमारतींनी वने गिळकृंत केली

पिंपरी : शहरीकरण वाढत असताना डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे भव्य इमारतींनी वने गिळकृंत केली आहेत. मावळ, मुळशी आणि खेडमधील वनवैभव धोक्यात आले आहे. नैसर्गिक सौंदर्याचे आमिष दाखवून गृहप्रकल्प राबविणारे लोक डोंगर-दऱ्यांच्यालगत विविध प्रकारच्या सिटी विकसित करीत आहेत. नवीन पर्यटनस्थळ विकसित केली जात असल्यामुळे वनांचे सौंदर्य नष्ट होऊ लागले आहे. पिंपरी-चिंचवड या शहराच्या परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर वनवैभव होते. आता वृक्षांचे प्रमाण कमी झाले आहे. मावळ-मुळशीत वनवैभव दिसून येते. एकूण ३० हजार हेक्टर भाग वनाने व्यापलेला आहे. यातील काही भाग आंबेगाव व खेडचा आहे. मात्र, या भागात नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे वनविभागातील अतिक्रमण हटविण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे. झोपड्या हटविणे एक डोकेदुखी झली आहे. पोलिसी कुमक मागविण्याशिवाय वन विभागसमोर पर्याय नाही. वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावरवनसंपदेतील जैववैविध्य यामुळेच नष्ट होत गेले आहे. नवीन प्रजाती उत्पन्न होणे बंद झाले आहे. जंगलातील प्रजातींचे संवर्धन होणे ही एक मोठी जबाबदारी वन विभागावर आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक आहे. वनांतील त्रिफळा, बेहडा, हिरडा अशा आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा उपयोग केला जात आहे. आजही वटवाघूळ, साळविंदर यांची शिकार होत आहे. जंगलाच्या असुरक्षिततेत वाढ होत चालली आहे, हे यातून निदर्शनास आले आहे. जमिनीची धूप व पाण्याची गरज भागविण्याचे काम जंगल करीत आहेत. वनांच्या जनजागृतीची गरज आहे. (वार्ताहर)वृक्षारोपण कागदावरच : महापालिकेचे दुर्लक्षमाजी आयुक्त हरनामसिंग यांच्या कालावधीत शहरातील विविध भागांत ५५ हजार वृक्षांचे रोपण केले होते. त्यामुळे भोसरी भागात मोठे वृक्ष दिसून येत आहेत. १९८२ नंतर झाडांच्या प्रमाणात वाढ झालीच नाही. वृक्ष प्राधिकरण समिती, शहरातील विविध पर्यावरण समित्यांनी वृक्ष लागवडीसाठी कसोशीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. वनांची जनजागृती व विकास या दृष्टीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. हरनामसिंग यांच्या क ालावधीत वनांचा विकास झाला, त्यानंतर आजतागायत झाडे विकसित झाली नाहीत. त्या काळात कमी पावसावरही दीर्घायुषी झाडे लावली गेली व ती झाडे जगली आहेत.शहरी भागातील वनराई झाली लुप्तमहानगरपालिकेत प्रथम १४ गावे समाविष्ट झाली. विकासाच्या दृष्टीने गावांचा विकास होत गेला. मात्र, यामुळे जंगलाचे प्रमाणही तेवढेच कमी झाले व पर्जन्यवृष्टीचे प्रमाणही घटले. यामुळे ग्रामीण भागांवर शहर विकासाचे अतिक्रमण होणे, ही तितके च धोकादायक झाले आहे. शहरात रावेत, थेरगाव, भेगडेवाडी, वाल्हेकरवाडी, किवळे, चऱ्होली, तळवडे या भागात झाडांचे प्रमाण अधिक होते. आता फक्त दुर्गाटेकडीच्या भागातच वनवैभव दिसून येत आहे.मावळ-मुळशी भागात डोंगराळ जमीन जास्त आहे. या भागात वाहून जाणारी माती दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे. मात्र, नव्याने जास्त लागवड न होणारी जमीन उरलेली नाही. यासाठी जल व माती संवर्धन करणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियान व्यापक स्वरूपात राबविणे आवश्यक आहे. अतिक्रमणप्रवण क्षेत्रातही वाढ होत चालली आहे. यालाही आळा घालणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरण समित्यांनी व्यक्त केले आहे. शहराचा विकास झाला, तसा वनांचा विकास होत नाही. आज वनांवर स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. चोरट्या वृक्षतोडीवर वचक निर्माण झाला आहे. अवैध वृक्षतोड थांबली आहे. - सचिन डोंबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ