शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

मूठभरांच्या सोयीसाठी हजारो वृक्षांचा बळी

By admin | Updated: November 26, 2015 01:11 IST

दुतर्फा हजारो वृक्ष असणारा, भर उन्हातही थंडगार सावली देणारा रस्ता उखडून तो भकास करण्याचा घाट ‘स्मार्ट सिटी’ होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुणे महापालिकेने घातला आहे.

पुणे : दुतर्फा हजारो वृक्ष असणारा, भर उन्हातही थंडगार सावली देणारा रस्ता उखडून तो भकास करण्याचा घाट ‘स्मार्ट सिटी’ होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुणे महापालिकेने घातला आहे. नव्याने निर्माण होत असलेल्या वसाहतीमधील काही बड्या लोकांच्या सोयीसाठी, या देखण्या रस्त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रस्त्यावरच्या हजारो वृक्षांचा बळी तर जाईलच; शिवाय टेकडीच्या पायथ्याचा काही भाग व तिथे लावलेल्या आणखी काही वृक्षांचीही कत्तल होण्याची चिन्हे आहेत. ‘स्मार्ट सिटी’मध्ये हिरवाईला महत्त्व असताना नेमका त्याच्या उलट प्रकार करण्याच्या, या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध सुरू केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा शेजारच्या वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को-आॅपरेटिव्ह मॅनेजमेंट (वॅमनीकॉम) रस्त्यावर पालिकेने हे गंडातर येऊ घातले आहे. ही सगळी जागा विद्यापीठाची, त्यांनी ती वॅमनीकॉम संस्थेला दिली. संस्थेने ती विकसित केली. अंतर्गत रस्त्यावर हजारो वृक्ष लावून, जोपासून दृष्ट लागावी अशी सुंदर केली. ते पाहून संस्थेच्या आवारातील एक टेकडीही विद्यापीठाने संस्थेला विकसित करण्यासाठी दिली. स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागाने ही वैराण टेकडीही हिरवीगार झाली. इतकी की तिथे आता काही मोर वस्तीला आले आहेत.या परिसरापासून दूरवर नव्याने निर्माण होत असलेल्या वसाहतीमधील काही बड्या लोकांच्या सोयीसाठी या देखण्या रस्त्यावर घाला घालायचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संस्थेच्या प्रवेशद्वारापासून सुरू होणारा रस्ता विद्यापीठाच्या औंध रस्त्यावरील जोशी गेटपर्यंत जातो. तिथून पुढे तो हॅरिस ब्रिजपर्यंत आहे. मधला लष्कराच्या मालकीचा काही भाग वगळता, अन्य परिसरात आता नव्याने वसाहती होत आहेत. त्यांना वाहतुकीला सोयीचे व्हावे, यासाठी या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यात या रस्त्यावरच्या हजारो वृक्षांचा बळी तर जाईलच; शिवाय टेकडीच्या पायथ्याचा काही भाग व तिथे लावलेल्या आणखी काही वृक्षांचीही कत्तल होण्याची चिन्हे आहेत. मूळ रस्ता विद्यापीठाचा, तो कराराने ‘वॅमनीकॉम’कडे आलेला, पालिकेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही; मात्र तरीही पालिका या रस्त्यावर हक्क दाखवित, त्यावरच्या वृक्षसंपदेवर कुऱ्हाड चालविण्याचा विचार करीत आहे. रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या आयसीएस कॉलनी व भोसलेनगरमधील सुमारे ३ हजार कुटुंबांनी पालिकेच्या या तुघलकी निर्णयाचा प्रतिकार करण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने लढा देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी ‘मोहल्ला समिती’ स्थापन केली आहे. एकही झाड तोडू देणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे; मात्र पालिका त्यांचे काहीही ऐकायला तयार नाही. (प्रतिनिधी)पुणे होणार सिमेंट काँक्रिटचे जंगलपुणे : पुणे शहर जुन्या हद्दीचा विकास आराखडा सरकारकडून मंजूर होण्याची वेळ आल्यानंतरही त्यावरची टीका अद्याप सुरूच आहे. या विकास आराखड्यात नव्या बांधकामांना मुक्त वाव दिल्यामुळे, येत्या काळात पुणे म्हणजे, सिमेंट काँक्रिटचे जंगल होण्याची भीती असल्याचे ग्रीन मुव्हमेंट या संस्थेने म्हटले आहे. याबाबत संस्थेच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात या विकास आराखड्यावर; तसेच तो आहे तसा मंजूर होऊन अमलात आला, तर होणाऱ्या दुष्परिणामांवर चर्चा झाली. खासदार वंदना चव्हाण, हेमंत चव्हाण, अनिता गोखले-बेनिंजर, विवेक वेलणकर, दीपक बीडकर, सुजित पटवर्धन, डॉ. विजय परांजपे, सारंग यादवाडकर, अनघा घैसास, रणजित गाडगीळ आदी या बैठकीला उपस्थित होते. नव्या इमारतींमधील सदनिका विक्रीविना पडून असताना, नव्या बांधकामाला परवानगी कशासाठी, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला. मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना ४ एफएसआय देण्यामुळे उंच इमारती उभ्या राहून पुण्याचा मूळ चेहरा बदलून जाईल, अशीही टीका करण्यात आली. संस्थेच्या वतीने या आराखड्याच्या विरोधात नागरिकांची चळवळ उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर प्रशासकीय स्तरावरही आराखडा अमलात येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.निकटचे संबंध असलेल्या व्यावसायिकांच्या दबावातून पालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रस्तारुंदीकरणाचा घाट घातला गेला असल्याची चर्चा आहे. रस्तारुंदीकरणासाठी काही आर्थिक तरतूदही केली असल्याचे समजते. जोशी गेटकडून वॅमनीकॉम संस्थेच्या गेटपर्यंतचा रस्ता आधी करून, नंतर वॅमकॉम ते वैकुंठ मेहता प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता तयार करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. पालिका हद्दीतील एक वृक्ष पाडायचा असला, तरी तो विषय पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीसमोर येतो. इथे इतके वृक्ष पाडणार असूनही अद्याप हा विषय पालिकेने समितीसमोर ठेवलेला नाही, असे समितीचे सदस्य अमेय जगताप यांनी सांगितले. विषय आल्यानंतर त्याला सर्वांत पहिला विरोध आपला असेल, असे ते म्हणाले.