शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

हजारो गरीब कुटुंबे आवास योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य दिले जाते. पुणे जिल्ह्यात १४ हजार ५०४ कुटुंबांना घरकुल मंजूर करण्यात आली. यापैकी आता पर्यंत केवळ ९ हजार २२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कुटुंबांना अर्धवट पैसे मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील हजारो गरिब, बेघर कुटुंबांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २१ हजार ४३८ घरे बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी जिल्ह्यात 14 हजार 504 घरांना मंजुरी देण्यात आली. परंतु या पैकी आता पर्यंत केवळ 9 हजार घरांची कामे पूर्ण झाली आहेत. तर 12 हजार 881 कुटुंबांना पहिला हप्त्याचे पैसे देण्यात आले, मात्र त्यानंतर अनेकांना पैसेच देण्यात आले नाहीत. ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील लोकांना पक्के घर करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र अनेकांना पहिला हप्ता दिल्यानंतर पुढचे पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे पडके घर तोडून पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आहे. पुढचे पैसे मिळालेच नसल्याने घराचे काम अर्धवट अवस्थेत आहेत, तर अनेकांनी पदरमोड करून, कर्ज काढून घरांची कामे पूर्ण करून घेतली आहेत.

-------

- जिल्ह्यात एकूण घरांचे उद्दिष्ट : 21 हजार 438

- जिल्ह्यात मंजूर घरांची संख्या : 14 हजार 504

- आता पर्यंत पूर्ण झालेली घरे : 9 हजार 22

--------

वर्षांपासून छप्पर बांधून राहतोय

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुल मंजूर झाल्याचे सांगण्यात आल्याने आम्ही आमचे राहते घर मोडले. परंतु नंतर तुमचा केवळ प्रस्ताव दिलाय अद्याप घरकुल मंजूर झाले नसल्याचे सांगितले. यामुळे मात्र गेल्या एक वर्षांपासून माझे कुटुंब छप्पराचे घर बांधून राहतोय. आता आम्हाला माहित नाही कधी घरकुल मंजूर होईल.

- दाजी कृष्णा निधन, तांबडेवाडी, खेड

------------------------------------

लाभार्थी स्वत: च घर बांधत असल्याने अडचण

शासनाने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आता सर्व गोष्टी ऑनलाईन केल्या आहेत. हे घरकुल मंजूर झाल्यानंतर संबंधित कुटुंबालाच सर्व खर्च करावा लागतो. घर जसे पूर्ण होईल तसे टप्प्या-टप्प्याने शासनाकडून ऑनलाईन पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. परंतू अनेक गरिब कुटुंबांकडे साहित्य खरेदीसाठी पैसे नसल्याने काम अर्धवट राहते. काम अर्धवट असल्याने पुढचे हप्ते मिळत नाही.

- संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक