शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

हजारो गरीब कुटुंबे आवास योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य दिले जाते. पुणे जिल्ह्यात १४ हजार ५०४ कुटुंबांना घरकुल मंजूर करण्यात आली. यापैकी आता पर्यंत केवळ ९ हजार २२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कुटुंबांना अर्धवट पैसे मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील हजारो गरिब, बेघर कुटुंबांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी शासनाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २१ हजार ४३८ घरे बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी जिल्ह्यात 14 हजार 504 घरांना मंजुरी देण्यात आली. परंतु या पैकी आता पर्यंत केवळ 9 हजार घरांची कामे पूर्ण झाली आहेत. तर 12 हजार 881 कुटुंबांना पहिला हप्त्याचे पैसे देण्यात आले, मात्र त्यानंतर अनेकांना पैसेच देण्यात आले नाहीत. ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील लोकांना पक्के घर करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र अनेकांना पहिला हप्ता दिल्यानंतर पुढचे पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे पडके घर तोडून पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आहे. पुढचे पैसे मिळालेच नसल्याने घराचे काम अर्धवट अवस्थेत आहेत, तर अनेकांनी पदरमोड करून, कर्ज काढून घरांची कामे पूर्ण करून घेतली आहेत.

-------

- जिल्ह्यात एकूण घरांचे उद्दिष्ट : 21 हजार 438

- जिल्ह्यात मंजूर घरांची संख्या : 14 हजार 504

- आता पर्यंत पूर्ण झालेली घरे : 9 हजार 22

--------

वर्षांपासून छप्पर बांधून राहतोय

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुल मंजूर झाल्याचे सांगण्यात आल्याने आम्ही आमचे राहते घर मोडले. परंतु नंतर तुमचा केवळ प्रस्ताव दिलाय अद्याप घरकुल मंजूर झाले नसल्याचे सांगितले. यामुळे मात्र गेल्या एक वर्षांपासून माझे कुटुंब छप्पराचे घर बांधून राहतोय. आता आम्हाला माहित नाही कधी घरकुल मंजूर होईल.

- दाजी कृष्णा निधन, तांबडेवाडी, खेड

------------------------------------

लाभार्थी स्वत: च घर बांधत असल्याने अडचण

शासनाने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आता सर्व गोष्टी ऑनलाईन केल्या आहेत. हे घरकुल मंजूर झाल्यानंतर संबंधित कुटुंबालाच सर्व खर्च करावा लागतो. घर जसे पूर्ण होईल तसे टप्प्या-टप्प्याने शासनाकडून ऑनलाईन पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. परंतू अनेक गरिब कुटुंबांकडे साहित्य खरेदीसाठी पैसे नसल्याने काम अर्धवट राहते. काम अर्धवट असल्याने पुढचे हप्ते मिळत नाही.

- संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक