शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

तीस टक्केच लघुउद्योग सुरू होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : जीवनावश्यक उत्पादने आणि निर्यातक्षम उत्पादने घेणाऱ्या कंपन्यांना परवानगी देण्याच्या निर्णयामुळे उद्योगनगरीतील तीस टक्के कंपन्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : जीवनावश्यक उत्पादने आणि निर्यातक्षम उत्पादने घेणाऱ्या कंपन्यांना परवानगी देण्याच्या निर्णयामुळे उद्योगनगरीतील तीस टक्के कंपन्या सुरू होऊ शकतील. पूर्ण क्षमतेने काम सुरू होऊ शकणार नसल्याचे मत उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात आले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एप्रिलअखेरीपर्यंत राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. औषधे, जीवनावश्यक वस्तू, कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, डेअरी, फोर्जिंग उद्योगांना परवानगी दिली आहे. तसेच शहरातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंची उत्पादन साखळी अबाधित राहणार आहे. या निर्णयामुळे उद्योगनगरीतील बड्या कंपन्या पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. परिणामी त्यावर अवलंबून असणाऱ्या कंपन्यादेखील पूर्ण क्षमतेने सुरू राहणार नाहीत. तसेच अनेक लघुउद्योग परदेशातील आणि स्थानिक मागणीवर अवलंबून आहेत. निर्यातीच्या कामाशी त्यांचा फारसा संबंध येत नाही. असे ७० ते ७५ टक्के सूक्ष्म आणि लघुउद्योग सुरूच होऊ शकणार नाहीत. उद्योगनगरीत अकरा हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत. या सर्व उद्योगांची घडी पुन्हा विस्कळीत होणार आहे.

---

निर्यात आणि जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित उद्योग सुरू राहणार आहेत. त्यामुळे शहरातील ७० टक्के उद्योग सुरू होऊ शकणार नाहीत. ऑटोमोबाईल संबंधित अनेक वस्तू शहरातून परराज्यात पाठविल्या जातात. त्यांना वेळेत माल न मिळाल्यास कंपन्यांच्या हातातील काम जाण्याची शक्यता आहे. याचा विचार झाला पाहिजे. उद्योगांना सरसकट परवानगी द्यायला हवी होती. त्याचबरोबर उद्योगांना लोखंड, स्टेनलेस स्टील, सुट्टे पार्ट, बेअरिंग अशा गोष्टींची आवश्यकता असते. या वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने किमान चार तास सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाने कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

- संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

----

जीवनावश्यक वस्तू आणि निर्यात करणारे उद्योग सुरू राहणार आहेत. त्यामुळे काही बड्या कंपन्यांनी आपली कामे कमी केली आहेत. त्यामुळे अनेक लघु उद्योगांना एका शिफ्टमध्ये काम करावे लागेल. उद्योगांचे कामकाज विस्कळीत होणार आहे.

- जयंत कड, उद्योजक

---

ऑटो मोबाईल कंपन्यांचे कामकाज विस्कळीत ?

जीवनावश्यक वस्तू आणि निर्यातीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. काही बड्या ऑटो मोबाईल कंपनींनी आपले काम कमी केली असल्याची माहिती काही लघुउद्योजकांनी दिली. रुग्णवाहिका, लष्करी वाहने, निर्यातीसाठीच्या वाहनांचे काम सुरू आहे. स्थानिक काम बंद ठेवण्यात आले आहे. टाटा मोटर्सने एका शिफ्टमध्ये काम करण्यास सुरुवात केल्याची चर्चा होती. त्याबाबत टाटा मोटर्सशी संपर्क साधला असता, त्यांनी ब्रेक द चेन या अंतर्गत आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत असल्याचे सांगितले. कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कंपनीतील ४५ वर्षांवरील कामगारांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे टाटा मोटर्सने स्पष्ट केले.