शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास वाड्या-वस्त्यांची ‘सौरपंपा’ने भागणार तहान

By admin | Updated: March 16, 2015 04:33 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१० पासून सौरपंपवार आधारित जिल्ह्यातील सुमारे ४५ वाड्या-वस्त्या पाणीटंचाईमुक्त झाल्या असून,

पुणे : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१० पासून सौरपंपवार आधारित जिल्ह्यातील सुमारे ४५ वाड्या-वस्त्या पाणीटंचाईमुक्त झाल्या असून, मेअखेरपर्यंत ५० कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेमुळे दुर्गम भागातही नळाद्वारे घराघरांत पाणी मिळणार आहे. महाराष्ट्रात ८५ टक्के ग्रामीण पाणीपुरवठा हा भूजलावर अवलंबून असल्याने विंधन विहिरीवरील हातपंप हा महत्त्वाचा घटक आहे. याचा विचार करून ग्रामीण जनतेला पिण्याच्या पाण्याचा योग्य प्रमाणात व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने ११ जानेवारी २०१० च्या शासननिर्णयाद्वारे सौरपंपावर आधारित लघुनळ-पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात राबविण्यात आल्या. योजनेसाठी साधारण ५ लाख रुपये खर्च होता. १० टक्के लोकवर्गणीची अट आहे. या योजनेमुळे भारनियमनकाळात तसेच विद्युत पंप नादुरुस्त झाल्यास हातपंपाद्वारे पाणी मिळते. नळ-पाणीपुरवठा योजनेच्या तुलनेत देखभाल-दुरुस्ती व अंमलबजावणीसाठी कमी खर्च येतो. भौगोलिक परिस्थितीमुळे वीजपुरवठा घेणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नसल्याने केवळ विंधन विहिरींवर अवलंबून असलेल्या वाड्या-वस्त्यांवर या योजना राबविण्यात येत आहेत. सन २०१०-२०११ मध्ये ३ गावांत, २०११-२०१२ मध्ये ४ गावांत तर २०१२-२०१३ मध्ये ३८ गावांत योजना राबविण्यात येऊन त्या कार्यरत आहेत. तसेच २०१४-२०१५ मध्ये ५० गावांत या योजना राबविण्यात येत असून, त्या प्रगतिपथावर आहेत. पुढील वर्षात २०१५-२०१६ मध्ये ६० गावांत कामे प्रस्तावित असल्याचे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता संदीप भुसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)