शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

पन्नास वाड्या-वस्त्यांची ‘सौरपंपा’ने भागणार तहान

By admin | Updated: March 16, 2015 04:33 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१० पासून सौरपंपवार आधारित जिल्ह्यातील सुमारे ४५ वाड्या-वस्त्या पाणीटंचाईमुक्त झाल्या असून,

पुणे : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१० पासून सौरपंपवार आधारित जिल्ह्यातील सुमारे ४५ वाड्या-वस्त्या पाणीटंचाईमुक्त झाल्या असून, मेअखेरपर्यंत ५० कामे प्रगतिपथावर आहेत. या योजनेमुळे दुर्गम भागातही नळाद्वारे घराघरांत पाणी मिळणार आहे. महाराष्ट्रात ८५ टक्के ग्रामीण पाणीपुरवठा हा भूजलावर अवलंबून असल्याने विंधन विहिरीवरील हातपंप हा महत्त्वाचा घटक आहे. याचा विचार करून ग्रामीण जनतेला पिण्याच्या पाण्याचा योग्य प्रमाणात व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने ११ जानेवारी २०१० च्या शासननिर्णयाद्वारे सौरपंपावर आधारित लघुनळ-पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात राबविण्यात आल्या. योजनेसाठी साधारण ५ लाख रुपये खर्च होता. १० टक्के लोकवर्गणीची अट आहे. या योजनेमुळे भारनियमनकाळात तसेच विद्युत पंप नादुरुस्त झाल्यास हातपंपाद्वारे पाणी मिळते. नळ-पाणीपुरवठा योजनेच्या तुलनेत देखभाल-दुरुस्ती व अंमलबजावणीसाठी कमी खर्च येतो. भौगोलिक परिस्थितीमुळे वीजपुरवठा घेणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नसल्याने केवळ विंधन विहिरींवर अवलंबून असलेल्या वाड्या-वस्त्यांवर या योजना राबविण्यात येत आहेत. सन २०१०-२०११ मध्ये ३ गावांत, २०११-२०१२ मध्ये ४ गावांत तर २०१२-२०१३ मध्ये ३८ गावांत योजना राबविण्यात येऊन त्या कार्यरत आहेत. तसेच २०१४-२०१५ मध्ये ५० गावांत या योजना राबविण्यात येत असून, त्या प्रगतिपथावर आहेत. पुढील वर्षात २०१५-२०१६ मध्ये ६० गावांत कामे प्रस्तावित असल्याचे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता संदीप भुसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)