शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तहान भागणार!

By admin | Updated: April 14, 2016 02:10 IST

धरणातून भीमा नदीपात्रात पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, ‘धरण उशाशी, ग्रामस्थ उपाशी’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाने

चासकमान : धरणातून भीमा नदीपात्रात पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, ‘धरण उशाशी, ग्रामस्थ उपाशी’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाने धरणातून डाव्या कालव्याद्वारे भीमा नदीपात्रात ५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यंदा धरण जवळ असूनही भीमा नदीपात्र पहिल्यांदाच कोरडे पडले होते. यामुळे परिसरातील गावांच्या नळपाणी पुरवठा योजना जवळ जवळ बंद पडत आल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे परिसरातील महिलांना हातपंपांचा आधार घ्यावा लागत होता. नागरिकांबरोबरच जनावरांच्या पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर झाला होता. ‘लोकमत’मध्ये शनिवार, दि. ९ रोजी पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीची रोखठोख बातमी छायाचित्रासह प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. राजगुरुनगरचा केदारेश्वर बंधारा भरेपर्यंत भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्यामुळे परिसरातील गावांची व राजगुरुनगर शहराची किमान एक महिना पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. पाणी सोडल्यामुळे तेथील नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले. (वार्ताहर)

चासकमान धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतुल देशमुख यांनी पाणी सोडण्यासाठी केलेला पाठपुरावा, यामुळे भीमा नदीपात्रात पिण्यासाठी पाणी सोडल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

घोडेगाव : डिंभे धरण उजव्या कालव्याला दि. १३ रोजी सकाळी ८ वाजता पाणी सोडण्यात आले. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या कालव्याला पाणी आल्याने आंबेगाव व शिरूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळला आहे. मात्र, हे आवर्तन फक्त पिण्यासाठी सोडण्यात आले असून, शेतीपिकांना पाणी उचलू नये; अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा नोटिसा डिंभे धरण पाटबंधारे विभागाने ठिकठिकाणी लावल्या आहेत. या कालव्याला पाणी यावे, अशी खूप मागणी होती. पाण्याअभावी पिके जळून गेली; मात्र आता सोडण्यात आलेले पाणी हे आंबेगाव व शिरूर या तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यावरून सायफन, वीजपंप, डिझेल पंपाद्वारे शेतीसाठी पाणी उचलू नये. कालव्याचा पाणी प्रवाह खंडित केल्यास किंवा कालव्यातून पाणी उचलल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने प्रत्येक ग्रामपंचायतीला दिली आहे व गावागावांत चिकटवल्या आहेत. तसेच, कालव्यावर पोलीस, महसूल, वीजवितरण कंपनी, पाटबंधारे विभाग यांचे पाहणी पथक नेमण्यात आले आहे. हे पाहणी पथक रात्रीही फिरणार असून, पाणी न उचलू देण्याची काटेकोर अंमलबजावणी करणार आहे. तसेच वीजवितरण कंपनीला कालव्यावरील उपसा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना देणत आल्या आहेत. यामुळे कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दिवसातील काही तास तरी मोटारी चालू द्याव्यात अशी मागणी ते करीत आहेत. (वार्ताहर)

शेतीलाही पाणी द्या! डिंभे उजव्या कालव्यातून सोडलेले पाणी फक्त पिण्यासाठीच असल्याने कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दिवसातील काही तास तरी मोटारी चालू द्याव्यात, अशी मागणी ते करीत आहेत. मात्र, कालव्याला अनेक ठिकाणी गळती असल्यामुळे आपोआप पाणी विहिरी, तलाव, बंधारे यांमध्ये जात असून, त्याचा काही शेतकऱ्यांना होईल.