शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तहान भागणार!

By admin | Updated: April 14, 2016 02:10 IST

धरणातून भीमा नदीपात्रात पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, ‘धरण उशाशी, ग्रामस्थ उपाशी’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाने

चासकमान : धरणातून भीमा नदीपात्रात पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, ‘धरण उशाशी, ग्रामस्थ उपाशी’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाने धरणातून डाव्या कालव्याद्वारे भीमा नदीपात्रात ५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यंदा धरण जवळ असूनही भीमा नदीपात्र पहिल्यांदाच कोरडे पडले होते. यामुळे परिसरातील गावांच्या नळपाणी पुरवठा योजना जवळ जवळ बंद पडत आल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे परिसरातील महिलांना हातपंपांचा आधार घ्यावा लागत होता. नागरिकांबरोबरच जनावरांच्या पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर झाला होता. ‘लोकमत’मध्ये शनिवार, दि. ९ रोजी पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीची रोखठोख बातमी छायाचित्रासह प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. राजगुरुनगरचा केदारेश्वर बंधारा भरेपर्यंत भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्यामुळे परिसरातील गावांची व राजगुरुनगर शहराची किमान एक महिना पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. पाणी सोडल्यामुळे तेथील नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले. (वार्ताहर)

चासकमान धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतुल देशमुख यांनी पाणी सोडण्यासाठी केलेला पाठपुरावा, यामुळे भीमा नदीपात्रात पिण्यासाठी पाणी सोडल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

घोडेगाव : डिंभे धरण उजव्या कालव्याला दि. १३ रोजी सकाळी ८ वाजता पाणी सोडण्यात आले. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या कालव्याला पाणी आल्याने आंबेगाव व शिरूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळला आहे. मात्र, हे आवर्तन फक्त पिण्यासाठी सोडण्यात आले असून, शेतीपिकांना पाणी उचलू नये; अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा नोटिसा डिंभे धरण पाटबंधारे विभागाने ठिकठिकाणी लावल्या आहेत. या कालव्याला पाणी यावे, अशी खूप मागणी होती. पाण्याअभावी पिके जळून गेली; मात्र आता सोडण्यात आलेले पाणी हे आंबेगाव व शिरूर या तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यावरून सायफन, वीजपंप, डिझेल पंपाद्वारे शेतीसाठी पाणी उचलू नये. कालव्याचा पाणी प्रवाह खंडित केल्यास किंवा कालव्यातून पाणी उचलल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने प्रत्येक ग्रामपंचायतीला दिली आहे व गावागावांत चिकटवल्या आहेत. तसेच, कालव्यावर पोलीस, महसूल, वीजवितरण कंपनी, पाटबंधारे विभाग यांचे पाहणी पथक नेमण्यात आले आहे. हे पाहणी पथक रात्रीही फिरणार असून, पाणी न उचलू देण्याची काटेकोर अंमलबजावणी करणार आहे. तसेच वीजवितरण कंपनीला कालव्यावरील उपसा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना देणत आल्या आहेत. यामुळे कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दिवसातील काही तास तरी मोटारी चालू द्याव्यात अशी मागणी ते करीत आहेत. (वार्ताहर)

शेतीलाही पाणी द्या! डिंभे उजव्या कालव्यातून सोडलेले पाणी फक्त पिण्यासाठीच असल्याने कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दिवसातील काही तास तरी मोटारी चालू द्याव्यात, अशी मागणी ते करीत आहेत. मात्र, कालव्याला अनेक ठिकाणी गळती असल्यामुळे आपोआप पाणी विहिरी, तलाव, बंधारे यांमध्ये जात असून, त्याचा काही शेतकऱ्यांना होईल.