शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

क्रिकेट, बॉलिवूडपेक्षा देशातील प्रश्नांवर चिंतन व्हावे : विक्रम गोखले

By admin | Updated: January 12, 2015 02:29 IST

क्रिकेट, बॉलिवूड आपल्या देशातील कला-क्रीडेचे सांस्कृतिक अधिष्ठान आहे. मात्र, राजकारण हा जिव्हाळ्याचा आणि आपल्या जीवनाशी संबंधित विषय आहे.

पुणे : क्रिकेट, बॉलिवूड आपल्या देशातील कला-क्रीडेचे सांस्कृतिक अधिष्ठान आहे. मात्र, राजकारण हा जिव्हाळ्याचा आणि आपल्या जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे क्रिकेट व बॉलिवूडपेक्षा देशातील समस्या व राजकारणावर अधिक चिंतन व्हायला हवे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित पाचव्या छात्र संसदेतील ‘चित्रपट आणि क्रिकेट क्षेत्रापेक्षा राजकारणाला प्राधान्य’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष ब्रिज बिहारीलाल बुटैल व लेखक व क्रीडा समालोचक विक्रम साठ्ये उपस्थित होते. आमदार जितू पटवारी, सी. एन. अश्वथनारायण यांना आदर्श आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गोखले म्हणाले, देशाला आज जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची गरज आहे. आजच्या तरुण पिढीमध्ये ही क्षमता आहे. त्यामुळे आतापर्यंतची राजकारणाची प्रतिमा विसरून नवी आदर्श प्रतिमा तयार करणे युवा वर्गाच्या हातात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्रित काम केले असते तर आजच्या राजकारणाचे चित्र वेगळे असते, असे गोखले यांनी नमूद केले.राजकारण हा भ्रष्टाचाराचा किंवा वाईटांचा अड्डा समजून त्याकडे पाठ फिरवण्यापेक्षा त्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे बुटैल म्हणाले. क्रिकेट आणि चित्रपटांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सरकारकडून पर्यायाने राजकारणातून येतात. त्यामुळे तीनही क्षेत्रांचा मेळ घालायला हवा, असे साठ्ये यांनी सांगितले.(प्रतिनिधी)