शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

क्रिकेट, बॉलिवूडपेक्षा देशातील प्रश्नांवर चिंतन व्हावे : विक्रम गोखले

By admin | Updated: January 12, 2015 02:29 IST

क्रिकेट, बॉलिवूड आपल्या देशातील कला-क्रीडेचे सांस्कृतिक अधिष्ठान आहे. मात्र, राजकारण हा जिव्हाळ्याचा आणि आपल्या जीवनाशी संबंधित विषय आहे.

पुणे : क्रिकेट, बॉलिवूड आपल्या देशातील कला-क्रीडेचे सांस्कृतिक अधिष्ठान आहे. मात्र, राजकारण हा जिव्हाळ्याचा आणि आपल्या जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे क्रिकेट व बॉलिवूडपेक्षा देशातील समस्या व राजकारणावर अधिक चिंतन व्हायला हवे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित पाचव्या छात्र संसदेतील ‘चित्रपट आणि क्रिकेट क्षेत्रापेक्षा राजकारणाला प्राधान्य’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष ब्रिज बिहारीलाल बुटैल व लेखक व क्रीडा समालोचक विक्रम साठ्ये उपस्थित होते. आमदार जितू पटवारी, सी. एन. अश्वथनारायण यांना आदर्श आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गोखले म्हणाले, देशाला आज जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची गरज आहे. आजच्या तरुण पिढीमध्ये ही क्षमता आहे. त्यामुळे आतापर्यंतची राजकारणाची प्रतिमा विसरून नवी आदर्श प्रतिमा तयार करणे युवा वर्गाच्या हातात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्रित काम केले असते तर आजच्या राजकारणाचे चित्र वेगळे असते, असे गोखले यांनी नमूद केले.राजकारण हा भ्रष्टाचाराचा किंवा वाईटांचा अड्डा समजून त्याकडे पाठ फिरवण्यापेक्षा त्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे बुटैल म्हणाले. क्रिकेट आणि चित्रपटांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सरकारकडून पर्यायाने राजकारणातून येतात. त्यामुळे तीनही क्षेत्रांचा मेळ घालायला हवा, असे साठ्ये यांनी सांगितले.(प्रतिनिधी)