शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सोन्यासारखी माणसे मिळाली

By admin | Updated: February 17, 2016 01:36 IST

साहित्य संमेलनात खर्च किती झाला, असे विचारले जात असले तरी यापेक्षा गेल्या ३५ वर्षांत शैक्षणिक संस्थेमध्ये काम करूनही जी संपत्ती मिळाली नाही, तितके प्रेम आणि सोन्यासारखी माणसे या संमेलनाने दिली

पुणे : साहित्य संमेलनात खर्च किती झाला, असे विचारले जात असले तरी यापेक्षा गेल्या ३५ वर्षांत शैक्षणिक संस्थेमध्ये काम करूनही जी संपत्ती मिळाली नाही, तितके प्रेम आणि सोन्यासारखी माणसे या संमेलनाने दिली. हा जगन्नाथाचा रथ एकट्याने न ओढता त्याला अनेकांचे हात मिळाले, चांगली माणसे मिळाली की हस्तक्षेप करू नये, नाही तर आपणच नाशाला जबाबदार ठरतो. जे चांगलं आहे ते आवर्जून घ्यावे, याच सकारात्मक ऊर्जेतून काम करीत राहिलो असल्याची भावना ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणेच्या वतीने डॉ. पी. डी. पाटील मानपत्र प्रदान सोहळ्याचे मंगळवारी आयोजन केले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते डॉ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, खासदार वंदना चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे, अरुण शेवते, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, विजय कुवळेकर, भारत देसडला आणि पी. डी. पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील उपस्थित होते. हा सन्मान सोहळा माझ्यासाठी वाढदिवसाची सरप्राईज भेट असल्याचे सांगून डॉ. पाटील म्हणाले, ‘‘हे संमेलन इतके मोठे होईल, असा विचार कधीच केला नव्हता. भक्तिभाव आणि विश्वास यांच्या जोरावर पुढे जात गेलो. परमेश्वराच्या मनात असेल तसंच घडेल, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे संमेलन आहे. स्वागताध्यक्ष म्हणून नव्हे तर मिळालेली माणसे आणि प्रेम यामुळे संमेलन यशस्वी करू शकलो. साहित्यिकांच्या गाठीभेटीतून आयुष्य बदलले. या संमेलनातून हेदेखील उमजले, की संमेलनाला आषाढी एकादशीसारखे साहित्याचे वारकरी जातात. हे संमेलन दरवर्षी झालंच पाहिजे. हे संमेलन जयपूरपेक्षाही मोठे आहे, अशी गुलजार, चेतन भगत यांच्याकडून मिळालेली दाद खूप काही सांगून गेली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आपला सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला येण्यास काहीसा विलंब लागला, अशी दिलगिरी व्यक्त करीत डॉ. पी. डी. पाटील यांनी ‘साहित्य संमेलनामुळे ‘माफी’ मागण्याची सवय लागली असल्याची मार्मिक टिप्पणीही केली.डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, ‘‘पी. डी. पाटील यांच्याशी २५ वर्षांचा ॠणानुबंध आहे. अजातशत्रू म्हणून आमच्याकडे पाहिले जात असले तरी प्रत्येक संस्था ही आपल्या विचार आणि तत्त्वांवर उभी राहते. भारती विद्यापीठानेही १९९८ मध्ये कोथरूड भागात ग्रामीण संमेलन भरविले होते. साहित्य महामंडळाने संधी दिली तर आम्हीही संमेलन आयोजनाचा निश्चितपणे विचार करू.’’निवेदक सुधीर गाडगीळ यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना प्रश्नातून बोलते करून काहीशा कोपरखळ्या मारल्या. त्याला सर्वांनी तितकीच उत्स्फूर्त दाद दिली. हा प्रश्नोत्तराच्या तासाने उपस्थितांची हसून पुरे वाट झाली. प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांच्या ‘आम्ही घामाचे धनी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.(प्रतिनिधी)