शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

सोन्यासारखी माणसे मिळाली

By admin | Updated: February 17, 2016 01:36 IST

साहित्य संमेलनात खर्च किती झाला, असे विचारले जात असले तरी यापेक्षा गेल्या ३५ वर्षांत शैक्षणिक संस्थेमध्ये काम करूनही जी संपत्ती मिळाली नाही, तितके प्रेम आणि सोन्यासारखी माणसे या संमेलनाने दिली

पुणे : साहित्य संमेलनात खर्च किती झाला, असे विचारले जात असले तरी यापेक्षा गेल्या ३५ वर्षांत शैक्षणिक संस्थेमध्ये काम करूनही जी संपत्ती मिळाली नाही, तितके प्रेम आणि सोन्यासारखी माणसे या संमेलनाने दिली. हा जगन्नाथाचा रथ एकट्याने न ओढता त्याला अनेकांचे हात मिळाले, चांगली माणसे मिळाली की हस्तक्षेप करू नये, नाही तर आपणच नाशाला जबाबदार ठरतो. जे चांगलं आहे ते आवर्जून घ्यावे, याच सकारात्मक ऊर्जेतून काम करीत राहिलो असल्याची भावना ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणेच्या वतीने डॉ. पी. डी. पाटील मानपत्र प्रदान सोहळ्याचे मंगळवारी आयोजन केले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते डॉ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, खासदार वंदना चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे, अरुण शेवते, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, विजय कुवळेकर, भारत देसडला आणि पी. डी. पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील उपस्थित होते. हा सन्मान सोहळा माझ्यासाठी वाढदिवसाची सरप्राईज भेट असल्याचे सांगून डॉ. पाटील म्हणाले, ‘‘हे संमेलन इतके मोठे होईल, असा विचार कधीच केला नव्हता. भक्तिभाव आणि विश्वास यांच्या जोरावर पुढे जात गेलो. परमेश्वराच्या मनात असेल तसंच घडेल, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे संमेलन आहे. स्वागताध्यक्ष म्हणून नव्हे तर मिळालेली माणसे आणि प्रेम यामुळे संमेलन यशस्वी करू शकलो. साहित्यिकांच्या गाठीभेटीतून आयुष्य बदलले. या संमेलनातून हेदेखील उमजले, की संमेलनाला आषाढी एकादशीसारखे साहित्याचे वारकरी जातात. हे संमेलन दरवर्षी झालंच पाहिजे. हे संमेलन जयपूरपेक्षाही मोठे आहे, अशी गुलजार, चेतन भगत यांच्याकडून मिळालेली दाद खूप काही सांगून गेली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आपला सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला येण्यास काहीसा विलंब लागला, अशी दिलगिरी व्यक्त करीत डॉ. पी. डी. पाटील यांनी ‘साहित्य संमेलनामुळे ‘माफी’ मागण्याची सवय लागली असल्याची मार्मिक टिप्पणीही केली.डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, ‘‘पी. डी. पाटील यांच्याशी २५ वर्षांचा ॠणानुबंध आहे. अजातशत्रू म्हणून आमच्याकडे पाहिले जात असले तरी प्रत्येक संस्था ही आपल्या विचार आणि तत्त्वांवर उभी राहते. भारती विद्यापीठानेही १९९८ मध्ये कोथरूड भागात ग्रामीण संमेलन भरविले होते. साहित्य महामंडळाने संधी दिली तर आम्हीही संमेलन आयोजनाचा निश्चितपणे विचार करू.’’निवेदक सुधीर गाडगीळ यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना प्रश्नातून बोलते करून काहीशा कोपरखळ्या मारल्या. त्याला सर्वांनी तितकीच उत्स्फूर्त दाद दिली. हा प्रश्नोत्तराच्या तासाने उपस्थितांची हसून पुरे वाट झाली. प्रसिद्ध कवी उद्धव कानडे यांच्या ‘आम्ही घामाचे धनी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.(प्रतिनिधी)