शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

नाझरेसह १८ तलाव होणार गाळमुक्त

By admin | Updated: April 9, 2015 05:12 IST

जिल्ह्यातील गाळात रुतलेल्या तलावांना आता नवसंजीवनी मिळणार असून, शासनाच्या ‘जलयुक्त शिवार योजन’च्या माध्यमातून त्यांतील गाळ काढण्यात येणार आहे.

बापू बैैलकर, पुणेजिल्ह्यातील गाळात रुतलेल्या तलावांना आता नवसंजीवनी मिळणार असून, शासनाच्या ‘जलयुक्त शिवार योजन’च्या माध्यमातून त्यांतील गाळ काढण्यात येणार आहे. तशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार केला असून, त्याची कामे लवकरच सुरू होणार आहेत. यासाठी २ कोटी ५४ लाखांचा निधी दिला जाणार आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलसंधारणच्या माध्यमातून जलायश, मोठे व मध्यम स्वरूपाचे तलाव बांधण्यात आले आहेत. गळती व गाळामुळे या तलावांतील पाण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. काही तलाव तर गाळात रुतले आहेत. या तलावांतील गाळ काढण्याचा यापूर्वीही प्रयत्न झाला. मात्र, काही तलाव हे वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वन विभागाने त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे हे तलाव दिवसेंदिवस गाळात रुतल्याचे चित्र आहे. आता शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार योजने’च्या माध्यमातू आता जिल्ह्यातील १८ तलावांतील गाळ काढण्याचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे काम करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले. यात पुरंदर तालुक्यातील पिलाणवाडी व नाझरे, बारामतीतील सुपे, इंदापूरमधील तरंगवाडी, खेडमधील कडूस व इंदिरा पाझर तलाव, आंबेगावमधील पोंदवाडी-खडकवाडी, दौंडमधील खोर यांसह १८ तलावांतील गाळ काढला जाणार आहे. २ कोटी ५४ लाखांचा निधी यासाठी दिला जाणार असून, प्रत्येक तलावासाठी साधारण २५ लाखांचा निधी मिळणार आहे. हे काम करून घेण्यासाठी प्रत्येक कामासाठी एका अधिकाऱ्याकडे पालकत्व दिले जाणार आहे.