शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दावडीतील तलाठी कार्यालय असून अडचण नसून खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:08 IST

दावडी : येथील तलाठी कार्यालयात तलाठी येत नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहे. तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा अशी ...

दावडी : येथील तलाठी कार्यालयात तलाठी येत नसल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहे. तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नियमित न येणाऱ्या तलाठी व कोतवाल यांना नागरिक वैतागून गेले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही कुठलीही सुधारणा होत नसल्यामुळे वरिष्ठांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठे दावडी गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास १० हजारांच्या आसपास आहे. गावाला अनेक वाड्यावस्त्या जोडल्या असल्यामुळे शेतकरी व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने गावात तलाठी कार्यालय उघडले आहे. येथे कार्यरत असलेले तलाठी कर्तव्य बजावत नसल्यामुळे कामे खोळंबली असून, नागरिकही हैराण झाले आहेत. तलाठी कार्यालयाच्या परिसरात, ‘तलाठी भाऊसाहेब व कोतवाल दिसले का’, अशी शेतकरी विचारणा करताना दिसतात. तलाठी व कोतवाल आपल्या कर्तव्यात कसूर करीत असून कार्यालयात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कोतवालही कार्यालय उघडत नाही शिवाय शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. शेतकऱ्यांना सातबारा वेळेवर मिळत नसून वारसनोंदींची कामे खोळंबली आहेत. ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले, उतारे, दाखले मिळत नाही.

दिवसभर नागरिक व शेतकरी तलाठी कार्यालयासमोर थांबून तलाठी येण्याची वाट पाहतात. मात्र तलाठी मात्र कार्यालयातच फिरकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे. काही दिवसात माॅन्सून सुरू होईल. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी धडपडत आहेत. पीककर्ज मिळण्यासाठी सातबारावरील फेरफार, सातबारा दुरुस्ती आदी कामे करावी लागतात. परंतु या कामासाठी तलाठीच नसल्याने तसेच कोतवालही कार्यालय उघडत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध खोदकाम वाढत आहे. डोंगर, टेकड्या भुईसपाट होत आहे. याच्यावर नियंत्रणही नाही. या परिसरातून अवैधरित्या मुरूम, मातीची वाहने धावत असतात. तसेच महसूल वसुलीचे प्रमाणही कमी आहे. .............................................................

दावडी गावात तलाठी वेळेवर भेटत नसल्यामुळे नागरिकांना सातबाराचे उतारे दुरुस्ती वेळेवर होत नाही. एकूण जमिनीचा दाखला व इतरही प्रमाणपत्रे वेळेवर मिळत नाही. वारस नोंदीची कामे रखडली आहेत. तलाठी कार्यालय कधी उघडे तर कधी बंद असते. यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात.

संतोष सातपुते, सदस्य, ग्रामपंचायत, दावडी

०४ दावडी

दावडी (ता. खेड) येथील बंद असलेले तलाठी कार्यालय.