शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे स्वतंत्र प्रदर्शन असावे - राजेंद्र बनहट्टी यांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST

पुणे : “पुरस्कारांनी सन्मानित होणारी विविध वाङमय प्रकारातील उत्तम पुस्तके जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोचण्यासाठी पुरस्कार प्राप्त पुस्तकांचे स्वतंत्र प्रदर्शन ...

पुणे : “पुरस्कारांनी सन्मानित होणारी विविध वाङमय प्रकारातील उत्तम पुस्तके जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोचण्यासाठी पुरस्कार प्राप्त पुस्तकांचे स्वतंत्र प्रदर्शन असावे. ते भरविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घ्यावा,” अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेत कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. ‘सह्याद्रीच्या गिरिशिखरावरून’ या डॉ. अमर अडके लिखित ग्रंथाच्या उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीबद्दल हा पुरस्कार अक्षरदालन प्रकाशन कोल्हापूरचे अमेय जोशी यांना बनहट्टी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, ग्रंथनिवड समितीच्या सदस्य प्रा. रुपाली अवचरे उपस्थित होते.

बनहट्टी म्हणाले, ‘आशय हा कोणत्याही पुस्तकाचा आत्मा असतो, त्याला साजेशी पुस्तकनिर्मिती करणे यात प्रकाशकाची सर्जनशीलता दिसते.’ अध्यक्षीय भाषणात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, पुस्तक निर्मिती हा सामूहिक आविष्कार आहे. पुस्तक प्रकाशन-प्रक्रियेत लेखकाइतकेच मुद्रितशोधक, चित्रकार, बांधणीकार, छपाई करणारे यांचे योगदान महत्वाचे आहे.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ अमर अडके म्हणाले की, गिरिशिखरावर गेल्यानंतर आलेली अपूर्व अनुभूती शब्दांत मांडणे कठीण होते. या पुरस्कारामुळे सह्याद्रीच्या गिरिशिखरांशी स्नेहबंध जोडणाऱ्या सर्वांचा सन्मान झाला आहे. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.