शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

लोकशाहीत वादविवाद होता कामा नये : रविशंकर प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:09 IST

पुणे : सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे हा सुशासनचा एक भाग आहे. न्यायदानाची उत्तम व्यवस्था हा भारताला व्यवसाय अनुकूल ...

पुणे : सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे हा सुशासनचा एक भाग आहे. न्यायदानाची उत्तम व्यवस्था हा भारताला व्यवसाय अनुकूल देश बनवण्याच्या दृष्टीने महत्वाचा पैलू आहे. जर भारताला प्रगती करायची असेल, तर ती लोकशाहीद्वारेच करणे शक्य आहे आणि भारत लोकशाहीसाठी योग्य असेल तर वादविवाद होता कामा नयेत, असे प्रतिपादन केंद्रीय कायदे व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले.

सिम्बायोसिस लॉ स्कूल, या सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) च्या घटक संस्थेतर्फे सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमालेमध्ये ‘सोशल मीडिया आणि सोशल सिक्युरिटी’ आणि ‘क्रिमिनल जस्टीस सिस्टीम रिफॉर्मस: ॲन अनफिनिश्ड अजेंडा’ या विषयांवर ते बोलत होते. यावेळी सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.

रविशंकर प्रसाद यांनी प्रगतिशील भारत घडविण्यासाठी वैयक्तिक, सरकारी आणि बिगर-सरकारी क्षेत्रातील सक्रिय योगदानाला एकत्र कसे काम करावे लागेल याचा उल्लेख करून आपल्या अभिभाषणाची सुरुवात केली. ‘क्रिमिनल जस्टीस सिस्टीम रिफॉर्मस: ॲन अनफिनिश्ड अजेंडा’ या विषयावर त्यांनी सर्वप्रथम भाष्य केले. ज्यामध्ये त्यांनी फौजदारी कायद्यातील प्रकरणे सोडविण्यासाठी ठोस व्यावहारिक उपाययोजनांच्या गरजेवर भर दिला. सायबर तंत्रज्ञानाचे कौशल्य हे कायद्याची अंमलबजावणी, शैक्षणिक संस्था आणि न्यायपालिका यांच्यात असणे आवश्यक आहे. वाढत्या सायबर-गुन्ह्यांच्या घटना पाहाता सायबर भिंतींचे मजबुतीकरण करण्याची आणि विविध न्यायालयांद्वारे कायदेशीर खटल्यांचा डिजिटल निपटारा करण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली.

सध्या आपण एका डिजिटल युगात जगत आहोत. या जगात संधी व आव्हाने या दोन्ही गोष्टींना सामोरे जात आहोत असे सांगून रविशंकर प्रसाद यांनी डिजिटल इंडिया मोहिमेचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्याचा भारत घडवायचा आहे. यासाठी आपल्याला भारतीय प्रतिभा आणि माहिती तंत्रज्ञान एकत्रित करावे लागेल. इंटरनेटचा अधिकार मिळविणे ही एक मूलभूत गरज असली, तरी लोकशाहीच्या चौकटीत त्याबाबत तडजोड करता येणे शक्य नाही. ‘राईट टू प्रायव्हसी’ हा मूलभूत अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र प्रायव्हसीच्या आवरणाखाली इनोव्हेशन मारले जाता कामा नये.घरगुती, कमी खर्चात आणि सर्वसमावेशक असे डिजिटल तंत्रज्ञान प्राप्त केले जाऊ शकते असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन एसएलएस-पीचे उपसंचालक डॉ. बिंदू रोनाल्ड यांनी केले.

--------------------------------------------------------------------------------------