शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

प्रधान मास्तरांचे पुण्यात स्मारक व्हायला हवे : डॉ. शां. ब. मुजुमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, या विद्यानगरीत तत्त्वनिष्ठ आणि हाडाचे शिक्षक असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, या विद्यानगरीत तत्त्वनिष्ठ आणि हाडाचे शिक्षक असलेल्या प्रधान मास्तरांचे स्मारक व्हावे. ते पुढच्या पिढ्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरेल, अशी अपेक्षा सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केली.

समाजशिक्षक, साक्षेपी लेखक आणि विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, साधना साप्ताहिक, साहित्य शिवार दिवाळी अंक आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या वतीने 'प्रा. ग. प्र. प्रधान यांची विचारसृष्टी आणि समकालीन राजकारण' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, एस. के. कुलकर्णी त्यात सहभागी झाले होते. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, साहित्य शिवार दिवाळी अंकाचे संपादक जयराम देसाई, अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालिका रसिका राठिवडेकर उपस्थित होते. प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या 'स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत' आणि 'माझी वाटचाल' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शिरसाठ म्हणाले, प्रधान सरांनी स्वत:च्या मयार्दांविषयी स्वत:च प्रांजळपणे लिहून ठेवले त्यामुळे त्यांच्यावर कधीही टीका झाली नाही. त्यांचे अप्रकाशित साहित्य या वर्षात साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित केले जाईल.

गोखले म्हणाले, 'प्रधान सरांची भाषणे आजच्या लोक प्रतिनिधींनी अभ्यासली पाहिजेत. त्यांची विचारसृष्टी चौफेर वाचनातून घडली होती.

जोशी म्हणाले, 'आजच्या राजकारणामुळे कलुषित झालेल्या समाज जीवनात प्रधान सरांचे जीवन दीपस्तंभाप्रमाणे आहे. ज्या महाराष्ट्राला महात्मा गांधींनी कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हटले होते. त्या महाराष्ट्रात आज कुठे गेले कार्यकर्ते असा प्रश्न विचारावा लागतो ही शोकांतिका आहे.

जयराम देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. रसिका राठीवडेकर यांनी आभार मानले.